Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

शासनाच्या आदेशापुढे पोलिस बांधव हातबल, मनात वेदना होत असताना सुद्धा जनतेवरती कारवाई करण्यासाठी मन कठोर करावे लागते एक वेदनादायी बाब, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांची भूमिका म्हणजे “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा”

संपादक

          गेल्या दोन वर्षापासून कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, छोटे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते इ. असंख्य व्यवसायावर संकट आलेले आहे. शासनाचे आदेश जनतेच्या मुळावर उठले आहेत. जनतेला जगणे अवघड झाले आहे. देशातील जनता मरण यातना भोगत आहे. पोटभर अन्न मिळेना, बाहेर पडता येईना. नाव रोगाचे, आदेश शासनाचे जनतेवर कारवाई करण्यासाठी पोलिस बांधवाची जबाबदारी त्यामुळे पोलिस बांधवांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागते. पोलिस बांधव हे कोणाचेही दुश्मन नसतात शासनाच्या आदेशाला सामोरे जाऊन आपल्याच बांधवावरती कारवाई मनात नसताना करावी लागते हे पोलिस बांधवांना सुद्धा वेदना देणारे वाटते. पोलिस बांधवांचा ना इलाज असतो परंतु त्यातल्या त्यात पोलिस बांधवांनी न कळत जनतेचा विचार केला तर त्याचे त्यांना सुद्धा समाधान मिळेल. कर्तव्य जपा पण माणुसकीही जपा असे पोलिस बांधवाचे असले पाहिजे. या दोन वर्षात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे जनता पुर्णपणे होरपळून निघाली आहे. या काळात राज्यकर्ते जोमात आणि जनता कोमात गेलेली पाहत आहे. या रोगाच्या आपत्ती काळात कोणताही गुन्हा जनतेने केला नसताना ते गुन्हेगार आरोपी ठरले आहेत. स्वत:चे व कुटुंबाचे इतभर पोट भरण्यासाठी कोणता न कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करीत असताना त्यावरती सुद्धा पोलिस बांधवाची करडी नजर बघायला मिळत आहे. ज्या जनतेने मत देवून राज्यकर्ते बनवले तेच राज्यकर्ते जनतेचे शोषणकर्ते झाले आहेत अशी दैनिय अवस्था पाहत आहे. कोरोना या आपत्तीच्या काळात केंद्रातील तसेच विविध राज्यातील मंत्री मंडळातील राज्यकर्त्यांना कोरोना होवून मंत्री मंडळाची संख्या कमी झालेली दिसली नाही. हा रोग राज्यकर्त्यासाठी वरदान ठरला की काय? आणि जनतेसाठी शाप आहे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पोलिस बांधवांनो तुम्हीच मायेच्या पदराखाली या जनतेला सावली देवून छोटे मोठे व्यवसाय करण्यास जनतेला सहकार्य करा. जनतेला राज्यकर्त्याचा नव्हे तर पोलिस बांधवाचा आधार पाहिजे. तुम्हीच जनतेचे रक्षणकर्ते आहात त्यामुळे त्यांचे शोषण करू नका. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या आपत्तीच्या काळात निरपराध व्यक्ति तुमच्याकडून अपराधी बनली आहेत. “ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी” हे बरोबर आहे. नोकरीसाठी दिलेली जबाबदारी पार पाडावीच लागते. पोलिस बांधवांनो तुमच्यावर ताण आहे त्याची जनतेला जाण आहे आणि पोलिस बांधवांची नोकरी ही वेदनेच्या दारी आहे हेही पाहत आहे परंतु थोडे जनतेसाठी तुम्हीच मायबाप व्हा, नका जनतेला वेदना देवू, मिळालेले जीवन तुम्हीही वेदनामुक्त जगा आणि जनतेलाही जगू द्या. जनतेचा पाठीराखा व्हा, आधार व्हा, जनतेवर कारवाई करून समाधान मिळणार नाही. रोग येईल जाईल परंतु बांधवांनो या आपत्तीच्या काळात जनतेवर केलेली कारवाई, दाखल झालेले गुन्हे आयुष्यात गुन्हेगार म्हणूनच राहणार. जनतेसाठी शासनाचे आदेश जुगारून थोडेफार जनतेचे हाल होऊ नये यासाठी सहकार्य करा ही अपेक्षा जनतेची आहे. कोरोना या रोगाच्या आपत्ति काळात सर्वच राजकीय पक्षाच्या बैठका, मेळावे सुरू आहेत त्यांच्यासाठी का संचारबंदी नाही? असे असताना छोटे मोठे व्यापारी, कष्टकरी, शेतमजुर, अनेक लहान मोठे उद्योग धंदे बंद केले आहेत त्यांच्यासाठीच फक्त संचारबंदी आहे की काय? या कलावधीत विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत त्यांच्यासाठी शासनाचे आदेश लागू पडत नाहीत काय? केंद्र सरकार व राज्य सरकार मोठ्या उद्योग धंदे वाल्यांसाठी वरदान ठरत असून लहान व्यापारी यांना मात्र शाप ठरत आहेत म्हणून असे म्हणावे वाटते की, “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा त्याचप्रमाणे सरकारने मंदिरे खुली करावी त्यामुळे व्यापारी वर्गाला समाधान मिळेल व त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल इतकेच.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...