Skip to main content

शासनाच्या आदेशापुढे पोलिस बांधव हातबल, मनात वेदना होत असताना सुद्धा जनतेवरती कारवाई करण्यासाठी मन कठोर करावे लागते एक वेदनादायी बाब, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांची भूमिका म्हणजे “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा”

संपादक

          गेल्या दोन वर्षापासून कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, छोटे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते इ. असंख्य व्यवसायावर संकट आलेले आहे. शासनाचे आदेश जनतेच्या मुळावर उठले आहेत. जनतेला जगणे अवघड झाले आहे. देशातील जनता मरण यातना भोगत आहे. पोटभर अन्न मिळेना, बाहेर पडता येईना. नाव रोगाचे, आदेश शासनाचे जनतेवर कारवाई करण्यासाठी पोलिस बांधवाची जबाबदारी त्यामुळे पोलिस बांधवांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागते. पोलिस बांधव हे कोणाचेही दुश्मन नसतात शासनाच्या आदेशाला सामोरे जाऊन आपल्याच बांधवावरती कारवाई मनात नसताना करावी लागते हे पोलिस बांधवांना सुद्धा वेदना देणारे वाटते. पोलिस बांधवांचा ना इलाज असतो परंतु त्यातल्या त्यात पोलिस बांधवांनी न कळत जनतेचा विचार केला तर त्याचे त्यांना सुद्धा समाधान मिळेल. कर्तव्य जपा पण माणुसकीही जपा असे पोलिस बांधवाचे असले पाहिजे. या दोन वर्षात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे जनता पुर्णपणे होरपळून निघाली आहे. या काळात राज्यकर्ते जोमात आणि जनता कोमात गेलेली पाहत आहे. या रोगाच्या आपत्ती काळात कोणताही गुन्हा जनतेने केला नसताना ते गुन्हेगार आरोपी ठरले आहेत. स्वत:चे व कुटुंबाचे इतभर पोट भरण्यासाठी कोणता न कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करीत असताना त्यावरती सुद्धा पोलिस बांधवाची करडी नजर बघायला मिळत आहे. ज्या जनतेने मत देवून राज्यकर्ते बनवले तेच राज्यकर्ते जनतेचे शोषणकर्ते झाले आहेत अशी दैनिय अवस्था पाहत आहे. कोरोना या आपत्तीच्या काळात केंद्रातील तसेच विविध राज्यातील मंत्री मंडळातील राज्यकर्त्यांना कोरोना होवून मंत्री मंडळाची संख्या कमी झालेली दिसली नाही. हा रोग राज्यकर्त्यासाठी वरदान ठरला की काय? आणि जनतेसाठी शाप आहे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पोलिस बांधवांनो तुम्हीच मायेच्या पदराखाली या जनतेला सावली देवून छोटे मोठे व्यवसाय करण्यास जनतेला सहकार्य करा. जनतेला राज्यकर्त्याचा नव्हे तर पोलिस बांधवाचा आधार पाहिजे. तुम्हीच जनतेचे रक्षणकर्ते आहात त्यामुळे त्यांचे शोषण करू नका. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या आपत्तीच्या काळात निरपराध व्यक्ति तुमच्याकडून अपराधी बनली आहेत. “ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी” हे बरोबर आहे. नोकरीसाठी दिलेली जबाबदारी पार पाडावीच लागते. पोलिस बांधवांनो तुमच्यावर ताण आहे त्याची जनतेला जाण आहे आणि पोलिस बांधवांची नोकरी ही वेदनेच्या दारी आहे हेही पाहत आहे परंतु थोडे जनतेसाठी तुम्हीच मायबाप व्हा, नका जनतेला वेदना देवू, मिळालेले जीवन तुम्हीही वेदनामुक्त जगा आणि जनतेलाही जगू द्या. जनतेचा पाठीराखा व्हा, आधार व्हा, जनतेवर कारवाई करून समाधान मिळणार नाही. रोग येईल जाईल परंतु बांधवांनो या आपत्तीच्या काळात जनतेवर केलेली कारवाई, दाखल झालेले गुन्हे आयुष्यात गुन्हेगार म्हणूनच राहणार. जनतेसाठी शासनाचे आदेश जुगारून थोडेफार जनतेचे हाल होऊ नये यासाठी सहकार्य करा ही अपेक्षा जनतेची आहे. कोरोना या रोगाच्या आपत्ति काळात सर्वच राजकीय पक्षाच्या बैठका, मेळावे सुरू आहेत त्यांच्यासाठी का संचारबंदी नाही? असे असताना छोटे मोठे व्यापारी, कष्टकरी, शेतमजुर, अनेक लहान मोठे उद्योग धंदे बंद केले आहेत त्यांच्यासाठीच फक्त संचारबंदी आहे की काय? या कलावधीत विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत त्यांच्यासाठी शासनाचे आदेश लागू पडत नाहीत काय? केंद्र सरकार व राज्य सरकार मोठ्या उद्योग धंदे वाल्यांसाठी वरदान ठरत असून लहान व्यापारी यांना मात्र शाप ठरत आहेत म्हणून असे म्हणावे वाटते की, “भगदाड मोकळे आणि मोरीला गोळा त्याचप्रमाणे सरकारने मंदिरे खुली करावी त्यामुळे व्यापारी वर्गाला समाधान मिळेल व त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल इतकेच.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...