महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावेत आरोग्य विभागाच्या २५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेतल्या जाणार्या परीक्षा रद्द का झाल्या? त्याची चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळू नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी
संपादक दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा देण्यासाठी , वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक दिवस अगोदर , तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे , काही विद्यार्थी मित्रांकडे , तर काही विद्यार्थी यांनी एसटी स्टँड , लॉज याचा आधार घेतला होता. वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली. विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते. विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला , संकट कोसळले , घायाळ झाले , विद्यार्थी यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण काय ? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा ह...