Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावेत आरोग्य विभागाच्या २५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेतल्या जाणार्‍या परीक्षा रद्द का झाल्या? त्याची चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळू नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी

संपादक  

          दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार्‍या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द  करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा देण्यासाठी, वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक दिवस अगोदर, तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे, काही विद्यार्थी मित्रांकडे, तर काही विद्यार्थी यांनी एसटी स्टँड, लॉज याचा आधार घेतला होता. वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली. विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते. विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला, संकट कोसळले, घायाळ झाले, विद्यार्थी यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण काय? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा हेतु होता काय? परीक्षा रद्द करायची वेळ का आली? परीक्षा घेण्याची मानसिकता नव्हती तर परीक्षेचे वेळापत्रक का काढले? महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो चीड आणणारा व चिंताजनक आहे. महाराष्ट्र सरकार विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळत आहे असे वाटते. शिकून पडलेली मूल नोकरी मिळेल या उद्देशाने वेळ, पैसा, मेहनत, मानसिक त्रास सहन करून परीक्षेसाठी तयारी करत असतात. महाराष्ट्र सरकार यांनी परीक्षा रद्द केली हे चुकीचे व वेदनादायी व गंभीर बाब आहे . असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितील असतात परंतु शिक्षण वाया जाऊ नये यासाठी परीक्षा देवून नोकरी लागेल, आई वडिलांच्या घामाचे चीज होईल असे असल्यामुळे परीक्षा देत असतात. परंतु सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी यांना त्याचा पश्चाताप भोगावा लागत आहे. परीक्षा रद्द करायची होती तर परीक्षेचे वेळापत्रक तयार का केले? महाराष्ट्र सरकारने झोपीत वेळापत्रक तयार केले काय? महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे होता. विद्यार्थी यांनी जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला जबाबदार महाराष्ट्र सरकारच असेल. परीक्षा रद्द करून सरकारने आनंद घेतला काय? महाराष्ट्र सरकारने तीन पक्षाच्या आघाडीतील मतभेद चुलित घाला, जनतेचे हित बघा, उद्योगधंदे सुरू करा, युवकांच्या हाताला रोजगार द्या, सर्व विभागाच्या रिक्त जागा भरा, मुलांना नोकरी द्या, विद्यार्थ्यांना भ्रम निराश करू नका. परीक्षा रद्द करण्या मागचा सुत्रधार कोण? या परीक्षेवेळी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र, जिल्हा, यामध्ये चुका झाल्या त्या चुका कर्मचारी यांनी दारू पिऊन केल्या काय? परीक्षा रद्द करण्याचे कारण काय याची चौकशी झाली पाहिजे असे संस्थापक बहुजन राष्ट्र शक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अभिमन्यु बी.आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे मागणी केली आहे.       

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...