Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावेत आरोग्य विभागाच्या २५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेतल्या जाणार्‍या परीक्षा रद्द का झाल्या? त्याची चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळू नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी

संपादक  

          दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार्‍या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द  करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा देण्यासाठी, वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक दिवस अगोदर, तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे, काही विद्यार्थी मित्रांकडे, तर काही विद्यार्थी यांनी एसटी स्टँड, लॉज याचा आधार घेतला होता. वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली. विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते. विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला, संकट कोसळले, घायाळ झाले, विद्यार्थी यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण काय? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा हेतु होता काय? परीक्षा रद्द करायची वेळ का आली? परीक्षा घेण्याची मानसिकता नव्हती तर परीक्षेचे वेळापत्रक का काढले? महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो चीड आणणारा व चिंताजनक आहे. महाराष्ट्र सरकार विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळत आहे असे वाटते. शिकून पडलेली मूल नोकरी मिळेल या उद्देशाने वेळ, पैसा, मेहनत, मानसिक त्रास सहन करून परीक्षेसाठी तयारी करत असतात. महाराष्ट्र सरकार यांनी परीक्षा रद्द केली हे चुकीचे व वेदनादायी व गंभीर बाब आहे . असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितील असतात परंतु शिक्षण वाया जाऊ नये यासाठी परीक्षा देवून नोकरी लागेल, आई वडिलांच्या घामाचे चीज होईल असे असल्यामुळे परीक्षा देत असतात. परंतु सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी यांना त्याचा पश्चाताप भोगावा लागत आहे. परीक्षा रद्द करायची होती तर परीक्षेचे वेळापत्रक तयार का केले? महाराष्ट्र सरकारने झोपीत वेळापत्रक तयार केले काय? महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे होता. विद्यार्थी यांनी जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला जबाबदार महाराष्ट्र सरकारच असेल. परीक्षा रद्द करून सरकारने आनंद घेतला काय? महाराष्ट्र सरकारने तीन पक्षाच्या आघाडीतील मतभेद चुलित घाला, जनतेचे हित बघा, उद्योगधंदे सुरू करा, युवकांच्या हाताला रोजगार द्या, सर्व विभागाच्या रिक्त जागा भरा, मुलांना नोकरी द्या, विद्यार्थ्यांना भ्रम निराश करू नका. परीक्षा रद्द करण्या मागचा सुत्रधार कोण? या परीक्षेवेळी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र, जिल्हा, यामध्ये चुका झाल्या त्या चुका कर्मचारी यांनी दारू पिऊन केल्या काय? परीक्षा रद्द करण्याचे कारण काय याची चौकशी झाली पाहिजे असे संस्थापक बहुजन राष्ट्र शक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अभिमन्यु बी.आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे मागणी केली आहे.       

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...