Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

माहिती अधिकाराचा उपयोग “ब्लॅकमेल” करण्यासाठी न करता “सत्य” शोधण्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे

संपादक

          २००२ मधील महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा आला तर १२ ओक्टोंबर २००५ ला केंद्राने माहिती अधिकार आणला. माहिती अधिकाराचा उपयोग जास्त प्रमाणात “ब्लॅकमेल” करण्यासाठी होतोय असे वाटते. माहिती अधिकारातून सार्वजनिक अथवा स्वत:च्या उपयोगासाठी माहिती मागितली पाहिजे ती “जनहितार्थसाठी” उपयोगात आणली पाहिजे. त्या माहितीतून सत्य दडले आहे ते बाहेर काढण्यासाठी या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. माहिती अधिकारातून माहिती विचारने काही गैर नाही. एक सामाजिक जबाबदारी समजून त्या माहितीतून पारदर्शीपणा आहे की नाही, भ्रष्टाचार झाला की नाही, उत्कृष्ठ कामे झाले की नाही, शासकीय निधिचा योग्य उपयोग केला गेला की नाही या पद्धतीने सत्य बाहेर काढण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे निवारण अधिकारी यांनी केले की नाही इ. माहिती राज्यजन माहिती अधिकारी, शासकीय माहिती अधिकारी हे खरी माहिती देतात की नाही किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात हे तपासून पाहण्यासाठी माहिती अधिकार वापरला पाहिजे जेणेकरून त्या अधिकार्‍याची अयोग्य अशी भूमिका नसली पाहिजे. माहिती अधिकार केवळ पैसे कमविण्यासाठी तसेच ब्लॅकमेल करण्यासाठी नसला पाहिजे.

          तसेच माहिती अधिकार केवळ अधिकारी यांना “सळो की पळो” सोडण्यासाठी नसावा किंवा त्रास देण्यासाठी नसावा त्या कायद्याचा वापर योग्य कारणासाठी, कामासाठी केला पाहिजे. केवळ दहशत पसरविण्यासाठी नसावा तसेच एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय किंवा इतरांना न्याय असे आढळून आले असेल तर त्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली गेली पाहिजे. केवळ माहिती मागणे, अधिकारी वर्गाला वेठीस धरणे हे योग्य नाही. ज्या अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार अहवाल त्या कार्यकर्त्याच्या विरोधात पाठवले असेल तर त्या अधिकार्‍याच्या बाबतीत माहिती अधिकारातून माहिती मागवून त्या अधिकार्‍याचा “पंचनामा” केला पाहिजे. काही राज्यजन माहिती अधिकारी तसेच शासकीय माहिती अधिकारी खरी माहिती देण्यास टाळाटाळ करणे, दफ्तर दिरंगाई करणे, वेळ काढूपणा करणे हे दिसत आहे. असे अधिकारी यांना “चाप” बसवण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग करणे हिताचे आहे. सगळीकडे शासकीय निधीतून उत्कृष्ठ कामे नसून सर्व काही “गोलमाल” दिसते. मला संपादक या नात्याने वाटते की, माहिती अधिकार वापरुन जे अधिकारी माहिती लपवतात त्यासाठी अपील ही पद्धत नसली पाहिजे होते. त्वरित पोलिस स्टेशनमध्ये “एफआयआर” दाखल करण्याची पद्धत असली पाहिजे होते. असे असते तर भ्रष्टाचारावरती आळा बसला असता असे वाटते. राज्य माहिती अधिकारी-अपील-आयोग हे दीर्घकालीन प्रक्रिया असून यामध्ये माहिती विचारणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातामध्ये काहीही लागत नाही हे मी पाहिले आहे. माहिती अधिकारातून माहिती मिळवण्यासाठी अभ्यासू वृत्तीने माहिती विचारली पाहिजे, ती माहिती प्रश्नार्थक नसली पाहिजे. त्या महितीचा उपयोग स्वत:साठी तसेच जनहितार्थ तसेच न्यायालयीन लढाईसाठी, न्याय-अन्याय यासाठी असला पाहिजे. केवळ पैसे कमविणे, ब्लॅकमेल करणे, दहशत पसरविणे, अधिकारी यांना त्रास देण्यासाठी असे होता कामा नये. माहिती अधिकाराचा उपयोग मोठ्या प्रमाणात चांगल्या कामासाठी करण्यात यावा. काही कार्यालयात जातिवादी व जातीला काळिमा असणारे असे जे अधिकारी असतात ते जाणूनबुजून माहिती लपवितात हे मी अनुभवले आहे. कार्यकर्त्याला भ्रष्टाचार झाला असे आढळून आले तर माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागितली पाहिजे. कार्यकर्त्यावर दबाब, बदनामी इ.चा अवलंब भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्ति करीत असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी भिवून न जाता किंवा दबावाला बळी न पडता माहिती मागण्यापासून भीती बाळगू नये त्यावर ठाम रहावे. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते माहिती अधिकारी कार्यकर्त्यावर दबाव टाकतात असा हेतु असतो त्यामुळे कार्यकर्ते यांनी घाबरून जाऊ नये इतकेच.  

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...