Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

कोल्हाटी समाजाने नवीन “प्रेरणा” घेऊन समाजामध्ये परिवर्तन घडवावे

  संपादक      कोल्हाटी समाजामध्ये नोकरीचे प्रमाण अत्यल्प असे आहे . या समाजातील कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबाला लक्ष्मी घरात आल्याचा आनंद होतो तर कुटुंबात मुलगा जन्माला आला तर म्हणावा तसा आनंद होत नाही याचे कारण म्हणजे या समाजात असलेल्या रूढी परंपरा. कोल्हाटी समाजातील बांधव आणि महिला उदरनिर्वाहासाठी कलेचा आश्रय घेतात हे आनंददायी आहे परंतु समाजातील ज्या आजपर्यंत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्या परंपरेत सुधारणा केली पाहिजे म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये समान हक्काची न्याय प्रणाली असायला हवी. उदा. ज्यावेळी मुलगा मुलगी यांच्या लग्नाची पाहणी ते लग्न असा जो कार्यक्रम असतो तो एकतर्फी असतो. मुलाला मुलगी पाहण्यासापासून ते लग्न पार पडे पर्यंत मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना वरदक्षिणा द्यावा लागतो त्यामुळे गरीब असो व श्रीमंत त्या मुलाच्या आई वडिलांना ५० , ०००/- (पन्नास हजार रुपये) ते ५ , ०००००/- (पाच लाख रुपये) व त्यापुढेही खर्च होऊ शकतो. मुलीच्या आई वडिलांना खर्च नसतो. सारा खर्च मुलाच्या आई वडिलांनी करायचा असतो ही कोल्हाटी समाजमधील परंपरा आ...

नातेपुते पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावामधील दारू,वाळू,जुगार,मटका व मनमानी या विरोधात दलित महासंघाचे केरबा बापू लांडगे यांचे अर्धंनग्न गुडघ्यावर बसून बेमुदत धरणे आंदोलन

  केरबा बापू लांडगे  (उपोषणकर्ते)  संपादक      नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर नातेपुते पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ व कनिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा बापू लांडगे यांनी बेमुदत धरणे आंदोलनासाठी कार्यालयीन वेळेत अर्धनग्न गुडघ्यावर बसून मास्क लावून , आंदोलन करीत आहेत. नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ व कनिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचा वाळू , जुगार , मटका , दारू करणारे आहेत त्यांना आधार देत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हफ्ते वसूल करीत आहेत. राजरोसपणे हे धंदे करीत असून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करीत नाहीत परंतु किरकोळ असे व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावर हे अधिकारी कारवाई करत आहेत असा भेदभाव कशासाठी ? असे केरबा लांडगे यांचे म्हणणे आहे. असे अवैध धंदे चालवणारे जे मालक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कामगारावर कशासाठी ? तसेच नातेपुते पोलिस स्टेशनचे अधिकारी बीट हवलदारामार्फत मोठ्या प्रमाणात हफ्ते वसूल करण्यास सांग...

नातेपुते पालखी तळाशेजारील राहत असलेले प्रा.दत्तात्रय साळवे सर यांच्या दुचाकीला अज्ञात व्यक्तींनी आग लावून जाळून नुकसान केले धक्कादायक अशी घटना

जाळण्यात आलेली हीच ती गाडी  संपादक नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील पालखी तळाशेजारील राहत असलेले प्रा.दत्तात्रय साळवे सर यांच्या घरापुढे कंपाऊंडच्या आतमध्ये असलेली होंडा कंपनीची दुचाकी गाडी नं.एम.एच.45 यू २४३० ड्रीम युगो या गाडीला आग लावून अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केले आहे. ही घटना समजताच नातेपुते पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी भेट दिली. ही घटना मंगळवारच्या १५/०६/२०२१ रोजीच्या मध्यरात्री घडलेली आहे. जळीत गाडीच्या शेजारी फोर व्हीलर गाडी होती परंतु त्या गाडीचे नुकसान झाले नाही. नातेपुते येथे दुचाकी जाळल्यामुळे रहिवाशी यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पालखी तळाशेजारील राहणार्‍या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रा.दत्तात्रय साळवे सर हे सरळमार्गी व्यक्ति असून ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे नोकरी करीत आहेत. ही घटना जाणूनबुजून कोणीतरी केली गेली असेही चित्र आहे. या घटनेची माहिती पोलिस स्टेशनकडे दिली जाणार आहे असे प्रा.दत्तात्रय साळवे सर यांनी सांगितले आहे. पालखी तळाशेजारील रहिवाशाची दुचाकी जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. गा...
  श्री. सदगुरू लक्ष्मणदास महाराज  संपादक वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील श्री. लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथि मोहोत्सव (भंडारा) दरवर्षी साजरा होत असतो परंतु गेल्या वर्षापासून व याही वर्षी १२/०६/२०२१ रोजी शनिवार या दिवशी होणारा (भंडारा) कोरोना कोव्हिड-१९ या आपत्तीमुळे होईल किंवा नाही परंतु मोजक्याच भाविकांना घेवून आरतीचा कार्यक्रम होईल असे माजी सरपंच गंगाधर पराप्पा गायकवाड यांनी माहिती दिली व हेच सकाळ संध्याकाळी महाराजांची आरती करीत असतात. महाराजांच्या (भंडारा) उत्सवामुळे वाखरी गावाला यात्रेचे स्वरूप येत असते. सप्ताह , कीर्तन , हरिपाठ पुण्यतिथि दिवशी येणार्‍या भाविकांना अन्नदानाचा प्रसाद दिला जातो. लक्ष्मणदास महाराज हे असंख्य भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. वाखरी या गावी महाराजांचे दगडी बांधकाम केलेले रेखीव व कोरीव दगडाचे बांधकाम असा मठ आहे. पुण्यतिथिच्या दिवशी गाव गजबुजून गेलेले असते. दिवसभर कार्यक्रम असतात. संध्याकाळी वाजत गाजत भजन म्हणत लेझिम खेळत महाराजांच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढली जाती. या दिवशी पंढरपूर ते वाखरी काही ट्रक मालक भक्तांना ने आण करण्यासाठी मोफत सेवा द...

सन २०११ पूर्वीपासून अतिक्रमणे ज्या कुटुंबाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेत केले आहे ती अतिक्रमणे त्या त्या कार्यालयातील कारभारी यांनी ठराव करून नियमित करावीत व घरकुलाचा लाभ देण्यात यावा.

संपादक        सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या तालुक्यातील ग्रामीण मधील गावठाण असो वा शहरातील शासनाची मोकळी जागा असो तेथे असंख्य कुटुंबांनी परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते सन २०११ पूर्वीपासून राहत आहेत. तसेच त्यांना घरामध्ये वीज कनेकशन , नळ कनेकशन , आजी-माजी पदाधिकारी यांनी घर बांधणेसाठी ना हरकत दाखला , ग्रामपंचायत , महानगरपालिका , नगरपालिका , नगारपरिषद , नगरपंचायत यांनी दिले असून ते पाणीपट्टी व वीज बिल भरत आहेत. यांची घरजागा नियमित होते. “राहील त्याची जागा व कसेल त्याची जमीन” हा कायदा लागू पडत आहे. तसेच या कुटुंबाकडे जुने नवीन रेशन कार्ड , मतदान ओळखपत्र , पाणीपट्टी पावती , वीज बिल पावती , भारत देशातील कोणत्याही ठिकाणचे आधार कार्ड , पॅन कार्ड , यापैकी कोणताही एक पुरावा अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी जे कुटुंब ग्रामपंचायत गावठाण हद्दीत व इतर पालिका हद्दीत अतिक्रमणे करून राहत आहेत त्या कुटुंबांनी वरील कार्यालयाकडे घर जागा नियमित करण्यासाठी अर्ज सादर करावेत त्यामुळे घर जागा नावावर झाल्यास त्या कुटुंबाला घरकुलचा लाभ मिळेल. तसेच एक वेदनादायी बाब आहे की , वरील का...

नातेपुते पालखी तळाशेजारील ५० वर्षानंतर ग्रामस्थांच्या सांडपाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवून रहिवाशांचा वनवास संपविला

  संपादक नातेपुते ग्रामपंचायत मधील उपसरपंच मा.अतुल(बापू) राजेंद्र पाटील व प्रकाश साळवे(ग्रामपंचायत सदस्य) व पॅनल प्रमुख व सरपंच , सदस्य यांच्या मानसिकतेमुळे वार्ड क्र.३ मधील रहिवाशांना भेडसावणारा जो सांडपाण्याचा प्रश्न होता त्यासाठी गटार महत्वाची होती. अनेक वार्ड क्र.३ मध्ये सरपंच , सदस्य होऊन गेले परंतु त्यांनी गटारीचा प्रश्न सोडविला नाही परंतु वार्ड क्र.३ मधून मा.अतुल(बापू) राजेंद्र पाटील सदस्य म्हणून निवडून आले व उपसरपंच झाले व प्रकाश साळवे हेही सदस्य म्हणून निवडून गेले त्यांनी वार्ड क्र.३ मध्ये रहिवासी यांचा सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावून मोठ्या सीमेंट पाईपांचा वापर करून बंदिस्त गटार काढून नातेपुते पालखी मैदान तळाशेजारील रहिवासी यांचा कायमचा प्रश्न मिटवला व रहिवाशांचा वनवास संपविला. निवडणुकीदरम्यान गटारीचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन अतुल (बापू) पाटील यांनी दिले होते ते पूर्ण करून ५० वर्षे रेंगाळलेला गटारीचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील , (उपसरपंच) व मा.प्रकाश साळवे (सदस्य) , ग्रामपंचायतमधील सरपंच , सर्व सदस्य , पॅनल प्रमुख त्यांचे ...