ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात यावी ही काळाची गरज: मा.श्री.डॉ.अभिमन्यु आठवले
संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्या सर्वच क्षेत्रात म्हणजे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, बी.डी.ओ., तहसिलदार, प्रांत, शिक्षक, डॉक्टर, जिल्हाधिकारी, वकील, इंजिनियर, कोर्ट इत्यादी विभागात शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार इत्यादी क्षेत्रात पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी त्यांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांना 10 वी पास, व इतर पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी किमान शिक्षण ग्रॅज्युट झालेले असायलाच पाहिजे व यांना सुद्धा पात्रता परीक्षा असायला पाहिजे.
सध्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असणे काळाची गरज आहे, परंतु यांना मात्र परीक्षा नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. हे पदाधिकारी लायक आहेत की नाही हे परीक्षा घेतल्यानंतर दिसून येतील.
यांच्यासाठी परीक्षा पेपर कसा असावा? प्रश्न पत्रिका कशी असावी? त्या प्रश्नपत्रिका मी काढून देईन. परीक्षा घेण्यासाठी शासनाची मानसिकता पाहिजे. पुढारी यांना मात्र कसलीच परीक्षा नाही, त्यामुळे ते भडवे बलात्कारी असो, खुनी असो, लुटारू असो, हे मात्र पुढारी पैशाच्या जोरावर पुढारी बनतात. तसेच मतदार सुद्धा चिरीमिरी घेऊन त्यांना मतदान करतात असे चालले आहे. लायकी नसलेले व्यक्ती पुढारी होतात आणि क्लासवन अधिकारी यांना अशा भडव्यांना मान द्यावा लागतो ही गंभीर बाब आहे. म्हणून पुढारी होण्यासाठीसुद्धा पात्रता परीक्षा असावी.
अक्कल शून्य हे आमदार, खासदार, मंत्री होतात, हे पात्रता परीक्षा पास झाल्यास अशा भडव्यांना पुढारी होता येणार नाही. सर्वच क्षेत्रात परीक्षा सक्तीची आहे मग पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असायला हवी. जेणेकरून त्यांची पुढारी होण्यासाठी लायकी कळेल, भडव्यांना कोणतेही ज्ञान नसते, तरीपण भडवे आमदार, खासदार होतात केवळ पैसे देऊन आणि याला जबाबदार मतदार आहेत. सध्या राजकारण नासके झाले आहे, पैसा फेको तमाशा देखो हे पाहायला मिळत आहे. विचारवंताना किंमत नाही, भुरट्यांना किंमत आहे हे मी स्वत: डॉ.अभिमन्यु आठवले संपादक तसेच संघटनेचा संस्थापक म्हणून पाहत आहे. पात्रता परीक्ष पुढारी यांना सुद्धा असणे काळाची गरज आहे.
जनहितार्थ
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment