Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील काँग्रेस पक्षाला जिवदान देणारे नेते ठरतील, जनतेच्या आशा पल्लवित, असंख्य युवक वर्ग काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक

  मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) मा.श्री. अॅड. रामहरी रूपनवर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)  संपादक           सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस (आय) पक्ष कमकुवत झाला होता. सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झाला असे सर्व जनतेलाच वाटत होते. त्यामुळे या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते यांची मानसिकता नव्हती. काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड वरिष्ठ नेत्यांनी केली आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस   पक्ष रसातळाला गेला होता. या पक्षाचे नाव घेण्या इतपत जनतेची मानसिकता नव्हती. या पक्षाचे या अगोदर पदाधिकारी झाले पण त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि कार्यकर्त्यांना वार्‍यावरती सोडले. काँग्रेस   पक्ष नावाला उरला आहे असे चित्र दिसत होते. असे असताना मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे काँग्रेस (आय) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आली आणि वातावरण बदलून गेले. जिल्हास्तरीय , तालुकास्...

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांची एक नंबर अशी ओळख

  मा.श्री.मिलिंद शंभरकर साहेब  (जिल्हाधिकारी सोलापूर)  संपादक           सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी यांनी या कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात जनतेच्या हिताच्या दृष्ठीने जेवढे शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सतत लक्ष दिले. हळूहळू कोरोना या रोगाची आपत्ती कमी होत आहे. शेतकर्‍यासाठी पीक कर्ज याबाबत चांगला निर्णय घेवून त्यांची प्रगती व्हावी. त्यांना आपत्ती काळात आधार मिळावा यासाठी कर्तव्य बजावले. कोरोना या रोगाचे संकट जनतेसाठी भयानक होते असे असताना पोलिस खाते , प्रांत , तहसिलदार , गटविकास अधिकारी , सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणारे स्वयंसेवक व अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत ते म्हणजे डॉक्टर व कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग. आपत्ती काळात जागृत राहून आपली कामगिरी पार पाडत आहेत. जिल्हाअधिकारी सोलापूर यांचे नाव मिलिंद शंभरकर जरी असले तरी ते एक नंबर जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता त्यांची ओळख पुसणार नाही. असे जिल्हाधिकारी पदाला शोभिल अशी कामगिरी करून एक ठसा उमटिवला आहे. काही निर्णय ...

नातेपुते येथे दिनांक ०७/१०/२०२१ रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा या उपक्रमाचे शिबीर संपन्न झाले हे शिबीर जनतेचे हित पाहणारे, जागरूकता निर्माण करणारे, येणार्‍या संकटासाठी आदर्श कामगिरी ठरेल

संपादक           नातेपुते येथे ०७/१०/२०२१ रोजी मधुर मिलन , नातेपुते या मंगल कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा या चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर संयुक्त उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम जिल्हा पोलिस अधिक्षक सौ.तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून राबविला जात आहे. या शिबिराच्या वेळी अकलुज विभागाचे पोलिस अधिकारी मा.श्री.शिवपूज तसेच नातेपुते पोलिस स्टेशनचे एपीआय मनोज सोलनकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन , दरोडा , बिबट्याचा हल्ला , सर्पदंश , पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला , आग जळीताची घटना , अपघात , याबाबत डी . के.बोर्डे संचालक नागरी सुरक्षा पुणे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा जनतेसाठी कशी फायद्याची आहे ते समजावून सांगितले व त्यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्येकाच्या जीवनात वेळ आणि काळ ठरलेला आहे. कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला कोण येईल तर ते म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी व जनता. कोणत्याही व्यक्तीवरती संकट आले तर क्षणात ...

सोलापूर जिल्हा स्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन म्हणजे “ना न्याय ना निवारण” ही चिंताजनक व चीड आणणारी भयानक परिस्थिती

संपादक      सोलापूर जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन हा चांगला उपक्रम राबविला जात आहे. जनता वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून लोकशाही दिनात आपल्या असलेल्या अडचणी त्या संदर्भात लेखी , अर्ज , निवेदने देवून अर्जदार पोच घेवून घरी परततात. परंतु दिलेल्या अर्जदाराच्या अर्जदाराच्या निवेदनाला अधिकारी यांच्याकडून “ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. मी संपादक म्हणून अनुभवले आहे. अर्जानुसार त्या त्या विभागाकडे लोकशाही दिनातील आलेले अर्ज पाठविले जातात. अहवाल मागवला जातो. परंतु त्यातून अर्जदाराला न्याय ही मिळत नाही आणि त्याच्या लेखी म्हणण्याचे निवारण ही होत नाही. म्हणायला लोकशाही दिन बरा वाटतो. पण या दिनातील अर्जदाराच्या अर्जाचे , निवेदनाचे म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. लोकशाही दिन म्हणजे अर्जदाराचे म्हणे समजून त्यावरती त्वरित न्याय देणे , अडचण असल्यास शासकीय स्तरावर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करणे , निवारण करणे असे असले पाहिजे. तसेच लोकशाही दिनात सर्व विभागाचे वरिष्ठ , कनिष्ठ अधिकारी हे हजर राहिले पाहिजेत. लोकशाही दिन म्हणजे न्यायदिन जनतेसाठी वरदान ठर...

साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे चौथ्या वर्षात यशस्वी वाटचाल

वैभव अ. आठवले  (उपसंपादक) (साप्ताहिक बहुजन भूषण) संपादक                साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे चौथ्या वर्षात पदार्पण होत आहे. यशस्वी वाटचाल होत आहे. या वृत्तपत्राला वाचक , जाहिरातदार यांनी जाहिराती देवून सहकार्य केले. गेली 2 वर्षे कोरोना कोव्हिड-१९  या रोगाच्या आपत्तीमध्ये ही संपादकाने जनहितार्थ म्हणून साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राच्या सोशल मीडिया पेज वरून वाचकापर्यंत जे दिसले , जे वाचले , जे अनुभवले त्या नुसार सडेतोड निर्भिडपणे विचार मांडले. साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र चौथ्या वर्षात तर , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यशस्वी घौडदौड चालू आहे. या वृत्तपत्रांना राजकीय , सामाजिक , शैक्षणिक संस्था , विविध सामाजिक संघटना , पतसंस्था , लहान-मोठे सामाजिक कार्यकर्ते , वाचक , जाहिरातदार इ. नी भरभरून आशीर्वाद दिला त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन .  त्यामुळे वृत्तपत्र चालवणे सोपे झाले. सध्या स्पर्धेचे युग चालू आहे. अशा या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विषय शोधून त्यावरती प्रबोधनवादी , परि...