Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

माळशिरस तालुक्यातील रोड रोमिओबाबत तालुक्यातील मुख्याध्यापकांची तात्काळ मीटिंग आयोजित करा: राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थांचे फार मोठ्या प्रमाणात जाळ आहे , परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळा किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओचा त्रास , शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोडरोमिओ मोटरसायकल वरून कर्ण कर्कश आवाज करीत मुलींच्या मागेपुढे फिरताना दिसतात.             याबाबत राजकुमार हिवरकर-पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी व तात्कालीन डी.वाय.एस.पी मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारीही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी , निर्भया पथक यांच्यासह बैठकीच आयोजन करावे असे सांगितले.  नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवादरम्यान आयोजन केले व नारीशक्ती सशक्त होण्यासाठी जिजाऊ सावित्री लेकीसाठी प्रशासन सक्षम आहे असे सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या गोष्टीला पाठीशी घातल जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीच आयोजन राजकुमार ह...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...

नातेपुतेच्या ‘मंडईचा राजा’ मंडळाला जिल्हास्तरीय ‘आदर्श मंडळ’ पुरस्कार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते सन्मान

   उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र   दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ, ‘मंडईचा राजा फाउंडेशन’ (स्थापना १९५०) यांना त्यांच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य करत असलेल्या या मंडळाला सोलापूर ग्रामीण पोलिस यंत्रणेतर्फे ‘जिल्हास्तरीय आदर्श गणेशोत्सव मंडळ’ म्हणून सन्मानित करण्यात आले.      हा पुरस्कार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘आदर्श गणेश उत्सव संकल्पने’ अंतर्गत मंडळाच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला. बुधवारी झालेया एका समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळेस श्री हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष -  विजय पिसे , उप अध्यक्ष - अभिजीत भिसे, खजिनदार - वैभव शहा तसेच मंडइचा राजा फाउंडेशन चे अध्यक्ष - विघ्नेश पदमन , उप अध्यक्ष - नीलेश गरगडे , सचिव - अमित चांगन , उपसचिव - तुषार देसाई तसेच मंडळातील सदस्य - धनंजय गरगडे,अमर भिसे, पृथ्वीराज पवार,राहुल दीक्षित व अक्षय...

नातेपुते पोलिसांनी तब्बल 4,97,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यासह किमती मुद्देमाल मूळ फिर्यादीस केला परत

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाणे मध्ये चोरीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या....! त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार ,cctv बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 4,97,000/-रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले त्याचे वर्णन खालील प्रमाणे...! 1) गुरन 133/2025 BNS कलम 309(4),3(5) 1)24000/-रुपये किमतीचे 30 मोठे सोन्याच्या मण्याची गळ्यातील पोत 2)24000/-रुपये किमतीचे लहान लहान 92 मन्याची सोन्याची गळ्यातील पोत मालक नामे वैभव विठ्ठल आष्टी रा. माळशिरस 2) गुरनंव- 105/2025 BNS कलम 305(2), 331(4)1) 90000/-रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची कंठी माळ 2)60000/-रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस 3)30,000/-रुपये किमतीचे10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मिनी गंठण 4)9000/-रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या रिंगा 5)20,000/- रुपये किमतीची 05 ग्रॅम वजनाची पिळ्याची अ...

कोळी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे, अभ्यासु व्यक्तिमत्व प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  आज महादेव कोळी समाजाची भयानक, गंभीर, परिस्थिती आहे, कोळी समाजाचे जगणे अवघड झाले आहे. बोटावर मोजण्या इतपत कोळी समाजाची प्रगती दिसत असली तरी ग्रामीण शहरामध्ये मुल, निवासी कोळी समाजाची भयानक बिकट परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे. कोळी समाजाचे हलाकीचे जीवन, व्यथा, वेदना प्रा.बाळासाहेब बळवंतराव सर यांनी पाहिली आहे.  सरांचे मत असे आहे की, ज्या जातीत मी जन्म घेतला त्या मी समाजाचे देण लागतो, माझा समाज हक्कापासून वंचित राहू नये, भेडसावणाऱ्या मूलभूत गरजा मिळाव्यात, समाज वंचित राहू नये अशी तळमळ सरांची आहे. समाजाचे संघटन अतिशय महत्वाचे आहे, अनेक वर्ष, पिढ्या गेल्या आहेत परंतु समाज प्रगती पासून वंचित राहिला आहे. समाजाची अधोगतीच आहे, शासनाच्या योजनांपासून दूर आहे. मूठभर समाजातील समाज बांधव सुधारले म्हणून समाज सुधारला असे होत नाही. त्यासाठी प्रा.बाळासाहेब  बळवंतराव सर धडपडीत आहेत.  समाजाचे जे अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची समाज बांधिलकी म्हणून समाज एक संघ करण्यासाठी, चळवळ उभी करण्यासाठी, समाज जागृत करण्यासाठी, समाजाची प्रगतीकडे...

मराठा समाजाची आंदोलने आदर्श घेण्यासारखी: मा.श्री.अभिमन्यू आठवले

संपादक: अभिमन्यु आठवले, बहुजन भूषण वृत्तपत्र आज पर्यंत जी आंदोलने मराठा बांधवानी केली ती सर्वं आदर्श घेण्यासारखी ठरली आहेत. आपल्या हक्कासाठी मराठा समाज आंदोलने करीत आहे. आंदोलने करणे हा सर्वं समाजाचा हक्क आहे, मराठा बांधवाची आंदोलने शिस्तबद्ध असतात हे मी संपादक म्हणून पाहिले आहेत. त्यांच्या आंदोलनात बेशिस्थपणा कधीच आढळून आला नाही. सध्या मनोज जरांगे पाटील मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत, लाखो बांधव सोबत आहेत. या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झाला नाही, त्रास होत आहे तो म्हणजे "राजकीय राज्यकर्ते." या राज्यकर्तेकडून आंदोलनकर्ते यांना व समाज बांधवाना जाणूनबुजून त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान करीत आहेत ही चिंताजनक व गंभीर बाब आहे.  मराठा समाजाने हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोणत्याही समाजाचे, व्यापारी वर्गाचे, किंवा बंधू-भगिनिंना नुकसान व त्रास झालेला दिसत नाही. उलट राज्यकर्ते यांनी आंदोलनकर्ते व समाज बांधवांचे हाल-हाल केले आहेत. शौचालय, हॉटेल, पाणी इत्यादी बंद करून गैरसोय केली ही लाजिरवाणी व चीड आणणार...