Skip to main content

"जातिवाद" हा माणुसकिला काळिमा


उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

सध्या जातिवाद मोठ्या प्रमाणात असून हा माणुसकीला काळिमा आहे. जातिवादी स्वत:ला उच्च दर्जाचे समजत आहेत. जातिवाद्यांना दलित समाजावर अन्याय करणे म्हणजे एक "फॅशनच" झाली आहे. दलित बांधवांची एकी नाही ही "नाडी" जातिवादी यांनी ओळखली आहे. तसेच दलित समाजातील ज्या ५९ जाती ह्या अनुसूचीत जातीमध्ये मोडतात त्या प्रत्येक जातीकडे "मी पणा, गर्व" आहे. तसेच या जाती सवलती घेण्यासाठी पुढे आणि रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी मागे अशी परिस्थिती आहे. दलित व्यक्तींवर अन्याय झाल्यास त्वरित रस्त्यावर उतरणारा समाज म्हणजे "बौद्ध समाज" होय. सध्या जातिवाद ग्रामीण भागात प्रचंड दिसून येत आहे. दलित समाजाचा त्यांना "विटाळ, अॅलर्जी" आहे. त्यामध्येही अनुसूचीत जातीमधील ५९ जातीचे पुढारी दलाली करताना दिसत आहेत ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. दलित सामाजावर दररोज जातिवादी समाजकंटक अन्याय-अत्याचार करीत आहेत. त्यामध्ये अयोग्य पाणी पिण्यास भाग पाडणे, जखमी करणे, अपमान व बदनामी करणे, अमानुष कृत्य करणे, दलित सामाजाच्या बेकायदेशीर जमिनी बळकावणे, दमदाटी करणे, भीक मागावयास लावणे, दलित सामाजाच्या जमिनी बळकावून वहिवाट करणे, दृष्टहेतूने खोटी व अधिकारी यांना दिशाभूल करणारी माहिती देणे, ग्रामपंचायत मधून खोटे ठराव करणे, अधिकारी यांना चुकीची माहिती देणे, विनयभंग करणे, जातिवाचक शिव्या देणे, लैंगिक छळ करणे, पाणी दूषित करणे, घरे जाळणे, घर पाडून रस्ता करणे, गाव सोडावयास लावणे, जबरदस्तीने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचेकडून जबरदस्तीने घर जागा सोडावयास लावणे, अधिकारी यांना खोटा पुरावा देणे, खून करणे, बलात्कार करणे इ.प्रकारे दलित सामाजावर अन्याय जातिवादी, हरामखोर, भाडखाऊ, समाजकंटक करीत आहेत. अशा जातिवादी यांना फाशीच दिली पाहिजे. त्यांना तर जगण्याचा अधिकार कशासाठी? गावात सर्वच जातिवादी नसतात, एखादे दुसरे घर गावात जातिवाद करत असते, त्याच जातिवाद्यांना बेघर केले पाहिजे, जेणेकरून गावात शांतता राहिली पाहिजे. जातिवाद्यांनी अनुसूचीत जातीतील अनेक तरुणांचा "बळी" घेतला आहे, त्यांची घरी उधवस्त केली आहेत. अनुसूचीत जाती जमातीच्या सर्वच जातीने यापुढे एकसंघपणे राहिले पाहिजे. तुमच्याकडे जमीन, पैसा काहीही नसूद्या, फक्त एकमेकांना साथ देवून, अन्याय करणारे जातिवादी आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी एकसंघपणा महत्वाचा आहे असे बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी आपली चीड, वेदना, व्यथा, खंत मांडली.

नांदेड जिल्हयातील बोंडारा गावातील अक्षय भालेराव याने गावात आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जातिवाद्यांनी त्या भीम सैनिकाचा खून केला त्या जातीवाद्याचा निषेध व अक्षय भालेराव या भीम सैनिकाला माझी भावपूर्ण आदरांजली...!

बातमी 

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.          

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...