Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते नगरीचे मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील म्हणजे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होय

मा.श्री.अतुल (बापू) राजेंद्र पाटील 
संपादक

          नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील यांचे सुपुत्र नातेपुते ग्रामपंचायतचे 2 वेळा सदस्य ते उपसरपंच या पदावरती काम केले आहे. उच्चशिक्षित, कुशल बागायतदार, अभ्यासू वृत्ती, नम्रतेने सर्व लहान थोरांना मान, सन्मान देणारे समाजकारण म्हणजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने, सर्व समाजाचे हित पाहणारे, दिला शब्द पाळणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके म्हणजे अतुल (बापू) पाटील होय. जनमानसात मिसळणारे, कधी पद असो वा नसो काम करीत राहणे हे बापूंचे ध्येय असते. तसेच संपत्ती याचा कधीही बापूना कधी गर्व नाही. शांत, संयमी म्हणून ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या हृदयामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण झाली आहे. राजकारण करीत असताना तेवढ्या पुरते राजकारण परंतु ते करीत असताना भेदभाव, द्वेष, मत्सर, वादावादी त्यांच्याकडून कधीही घडली नाही. "मूर्ति लहान पण किर्ती महान" हे सत्य बापूंविषयी खरे ठरले आहे. त्यांच्या विचारात, बोलण्यात गोडवेपणा, आपलेपणा असतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे गुण आहेत. मनमोकळेपणाने बोलणारे म्हणून बापूंकडे पाहिले जाते. नातेपुते ग्रामपंचायतचे 2 वेळा उपसरपंच म्हणून पदभार संभाळला असताना त्यांनी भरीव अशी कामे केली आहेत. त्यापैकी एक महत्वाचे काम म्हणजे पालखी मैदानाशेजारी केले गेलेले गटार. गटार हा वादावादीचा विषय होता. तेथील ग्रामस्थांचा सांड पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ते सांड पाणी कोठे सोडायचे हा प्रश्न ग्रामस्थांकडे अडचणीचा होता परंतु बापू उपसरपंच झाले व प्रकाश साळवे सदस्य या दोघांनी ५० वर्ष रखडलेला सांड पाण्याच्या गटारीचा प्रश्न सोडविला. हा प्रश्न सोडविल्यामुळे सर्व ग्रामस्थ बापूसाहेबांवरती खुश आहेत. असे काम करणारे बापूसाहेब जनतेसाठी खरे सेवक बनले आहेत. त्यांच्या दोन वेळा उपसरपंच पदाच्या कारकिर्दीत समाजउपयोगी कामे केली आहेत. सध्या नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले आहे. सोडत झाल्यामुळे वार्ड रचना बदलली गेली आहे. बापू म्हणजे आपला माणूस, कामाचा माणूस, हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली आहे. एक नावारूपाला असलेले गुणवंत, नामवंत, कीर्तीवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पद स्वीकारत असताना जनतेने निवडून दिले असताना त्याचा उपयोग जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी केला गेला पाहिजे अशी भूमिका त्यांची असते. नातेपुते गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायतला म्हणावा तसा निधि येत नव्हता. त्यामुळे विकास करता येत नव्हता. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असले तरी पण बापू यांनी उपसरपंच असताना तुटपुंज्या निधीतून कामे केली व कामे करण्यासाठी सदैव तयार असतात. आता तर नगरपंचायत झाली आहे. विकास कामांना भरपूर निधि उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नातेपुते गावाचा कायापालट होऊन एक विकासाचे मॉडेल होईल असे वाटते. मा.अतुल (बापू) पाटील कर्तव्यनिष्ठा, विकासनिष्ठा समजून काम करणारे धडाडीचे आहेत. त्यामुळे नगरपंचायत झाल्यामुळे वार्ड रचना बदलल्यामुळे आरक्षणाच्या सोडतीप्रमाणे बापू कोणत्या वार्डात उभे राहणार हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. बापू नातेपुते नगरपंचायत मध्ये असावे असे ग्रामस्थांना वाटत आहे इतकेच.

बातमी

  अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

          

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...