Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे

  वैभव आठवले  संपादक            साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२० रोजी तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक , सामाजिक , राजकीय , शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे , आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे. जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...! आपण आपली सामाजिक कामे , पक्षाकडून निवड , गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी “ ना नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे. आपण आपले लेख , विचार , कविता , भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिव...

“कोरोना काही जाईना संकट काही टळेना” भारत सरकारने या देशातील ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करून त्या योजनेसाठी होणारा खर्च या देशातील जनतेसाठी वापरुन जनता जगवावी

  संपादक           कोरोना कोव्हिड-१९ या   रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे जनता हैराण झाली आहे. कसे जीवन जगावे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामध्ये सरकारचे लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी हे आदेश काय करावे जनतेने ? जनतेला जगवण्यासाठी सरकारची जबाबदारी दिसून येत नाही. केवळ ताप , थंडी , सर्दी , गर्दी , तापमान कमी जास्त होणे , अंग दुखणे , दमा , शुगर , बीपी इ. लक्षणे प्रत्येक माणसामध्ये दिसून येत आहेत. परंतु ही लक्षणे आढळली म्हणून त्या व्यक्तिला कोरोना या रोगाचा रुग्ण म्हणून क्वारंटाईन केले जाते ही चिंताजनक बाब आहे. भारत सरकारने या देशात विविध योजना राबवत आहेत. त्या योजना बंद करून त्या योजनेला येणारा खर्च तो जनतेसाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानसी १०००/- रु. प्रमाणे त्यांना देऊन जगवावे त्यामुळे निदान जनता सुखी होईल. माणस मरत असतील तर त्या योजना बघणार कोण ? त्यामुळे भारत सरकारने जनतेचे हित पहावे. भारत सरकारने सर्व योजना बंद कराव्यात त्या निधिचा कोरोना या अपत्य काळा...

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भारत देशातील जनतेसाठी “बापमाणूस” आहेत

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर   संपादक           घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू   मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे या भारत देशातील जनतेसाठी सध्याचे “बापमाणूस” आहेत. स्वाभिमानी नेता , दिनदुबळ्यांचे कैवारी , प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेले एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी म्हणजे तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. रडण्यापेक्षा लढण्यात मजा असते. मागे लागून आमदार , खासदार होणे म्हणजे एक लाचारी असे साहेबांचे मत असते. साधी राहणी , उच्च विचार सरणी , कधी गर्व नाही असा सर्वांचा नेता आधार म्हणजे बापमाणूस प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर. दिलेला शब्द पाळणारे “ना भय ना भीती” बाळगणारे असे श्रेष्ठ साहेब आहेत. माझा प्रत्यके जातीपातीचा , धर्माचा बांधव आज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळत नाही , त्यांचावर अन्याय अत्याचार होतात म्हणून एक धाडसी , विद्वान , झुंजार नेते म्हणून ओळख असलेले मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आ...