Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन एक विश्लेषण

उपसंपादक : वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र) 

सध्या नातेपुते गाव हे मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात असून महादेवाची नगरी आहे. या ठिकाणी महादेवाचे रेखीव दगडी हेमाड पणती बांधकाम केलेले मंदिर आहे. नातेपुते हे गाव सोलापूर-सातारा-पुणे या जिल्ह्याला जोडणारे असून सर्वधर्म-समभाव जपणारे गाव अशी ओळख आहे. नातेपुते हे गाव पहिले ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात होते त्याचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. 

निवडणूका झाल्या, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष झाले, नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. त्यामुळे नातेपुते हे विकासाचे मॉडेल बनेल, दर्जेदार विकास होईल ही अपेक्षा शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांना होती परंतु या गावाला कोणाची दृष्ट लागली काय माहित.

शासनाचे परिपत्रक प्रारूप विकास आराखडा करणेबाबत आले असता नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रारूप विकास आराखडा बाबत चर्चा करून निर्णय घेणे योग्य होते परंतु तसे केले नाही. 

नातेपुते गावाला रिंग रोडची गरज काय?, अनेक शेतकरी यांची शेती या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जाताना दिसत आहे. नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी शेतकरी वर्गासोबत चर्चा केली पाहिजे होते. 

पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, उमाजी नाईक नगर, शिंदे बन, हिवरकर, घुगरदरे याचे कडील रस्ता, शिक्षक कॉलनी, वर्षां मेडिकल, पिरळे रोड, पालखी मैदान माऊली मंदिर, सोरटे वस्ती व बरडकर मळा, बोराटे मळा, इत्यादी ग्रामस्थांची शेती, घरेदारे या प्रारूप विकास आराखडा रुंदीकरण रस्त्यामुळे जाणार आहेत त्यामुळे शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ हे पुर्णपणे उध्वस्त होणार आहेत. प्रारूप विकास आराखडा रस्ता रुंदीकरण केल्यामुळे नागरिक बेघर होणार आहेत. नातेपुते नगरपंचायतने केलेला प्रारूप विकास आराखडा हा अन्यायकारक आहे. ग्रामस्थांना अंधारात ठेऊन प्रारूप विकास आराखडा तयार केला गेला हे माहिती अधिकारातून हाती लागलेल्या माहितीवरून सिद्ध होते. 

प्रारूप विकास आराखडा करण्यासाठी का घाई केली? हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. हा प्रारूप विकास आराखडा तयार करताना भौगोलिकदृष्ट्या अभ्यास न करता, ग्रामस्थांचे म्हणणे, त्यांच्या गरजा, अडचणी, लक्षात न घेता प्रारूप विकास आराखडा तयार केला गेला हे अयोग्य आहे.

सध्या नातेपुते नगरपंचायतकडून मूलभूत गरजा मिळत नाहीत, (पाणी उशाला कोरडं घशाला) ही भयानक परिस्थिती आहे. उत्कृष्ठ निधीतून निकृष्ट विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिमेंट पाईप वापरून बंदिस्त गटार केले आहेत ते नीट-नेटके नाहीत. सोरटे वस्ती जवळ पाण्याची पाईप लाईन सतत फुटत आहे, शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पालखी मैदान माऊली मंदिर शेजारी सिमेंट पाईप वापरून बंदिस्त गटार बनविले त्या ठिकाणी खोदाई केलेले रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त केले नाहीत, ग्रामस्थांना ये-जा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. 

मग प्रश्न पडतो की, जे रस्ते आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ग्रामस्थांना मिळेना आणि चालला विकास करायला? हा प्रारूप विकास आराखड्याचे गॅझेट मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द होऊ शकत नाही परंतु ग्रामस्थांचे म्हणणे, सूचना, वेदना समजून घेऊन शंभर टक्के यामध्ये बदल केला जाऊ शकतो, परंतु हुकूमशाही करता येत नाही. तसेच शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ उध्वस्त होता कामा नये यासाठी शिवसेना नेते मा.राजकुमार हिवरकर-पाटील झटत आहेत.

तसेच सर्व नगरपंचायत पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी होऊन या प्रारूप विकास आराखडयामध्ये बदल करावा यासाठी सहभाग नोंदवावा असे वाटते. सर्व बाधित शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी यांनी रास्ता रोको, साखळी उपोषण, आंदोलनात सहभागी व्हावे असे वाटते.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...