Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

नातेपुते येथील खंडोबा मंदिरावर सुवर्ण कलशा रोहन धार्मिक कार्यक्रमाचे शानदार आयोजन

उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र      नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे दिनांक 28-8-2023 वार सोमवार मिती श्रवण शुद्ध द्वादशी शके 1945 या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. हा आनंदी सोहळा दोन दिवस चालणार आहे दिनांक 27-8-2023 रविवार रोजी 9-30 ते 12-30 सुवर्ण कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्याच दिवशी 12-30 वाजता कलश स्वागत, दुपारी 1ते 4 होम हवन, दुपारी 1ते 3 महाप्रसाद कार्यक्रम, गणेश पूजन, पुण्याह वाचन, नांदी श्रद्धा असे कार्यक्रम होणार आहेत, तसेच 28-8-2023 सोमवार या दिवशी देवता स्थापना, जलशिवाय आणि धान्य दिवस सकाळी 7ते 10, अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना, होम हवन सकाळी 10ते 12-30 महंत ब्राह्मचारी ह.भ.प.भगवान महाराज वरप गावकर हस्ते कलश बसविण्यात येणार आहे व प्रसाद फराळ कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी हरी किर्तन महंत ह.भ.प भगवान महाराज वरप गावकर जि.बीड यांचे होणार आहे. महाप्रसाद श्री.गणेश उराडे बापु फ्रेंड्स ग्रुप नातेपुते यांच्या कडून होणार आहे.  तसेच सुवर्ण कलशा रोहन समिती नातेपुते यांच्या वतीने खंडोबा मंदिरावर सुवर्ण कलश बसविण्यात येणार आहे तरी सर्व बंधू भगिनी...

सोलापूर जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिन साजरा होत नाही त्यासाठी त्वरित सर्व तहसीलदार यांना आदेश द्यावेत: मा.श्री.डॉ. अभिमन्यू बी. आठवले

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होत नाही हि गंभीर बाब आहे. फक्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन न चुकता साजरा केला जातो हे कौतुकास्पद आहे परंतु जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन घेण्यास अधिकारी यांना का अॅलर्जी आहे हेच कळत नाही. लोकशाही दिन तालुका स्तरावर तहसील कार्यालयात साजरा झाल्यास जनतेचा पैसा, वेळ, मानसिक त्रास कमी होईल असे संपादक म्हणून वाटते. तसेच काही तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा होतो का? असे कर्मचारी यांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले कि येथे होत नाही. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तेथे होतो हे वेदनादाई आहे. तरी जनतेचे हित समजून मा.सोलापूर जिल्हाधिकारी यांनी त्वरित तहसील कर्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात यावा यासाठी तात्काळ आदेश काढून जनतेला होणारा त्रास कमी करावा. तहसील कार्यालयातील लोकशाही दिन जनतेला फायदेशीर ठरणार आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे अधिकारी यांनी निवारण केले नाही, टाळाटाळ केली, दखल घेतली नाही, दफ्तर दिरंगाई केली, अडचण असल्यास मार्ग...