Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

प्रत्येक कार्यालयात अधिकारी यांनी 'सरकारी कामात अडथळा' या कायद्यानुसार आरोप, दंड, शिक्षा याबाबत बोर्ड लावून जनतेला भीती दाखवण्याचे काम, त्या बोर्डाबरोबर अधिकारी यांनी आमची कर्तव्य यासाठी 'दफ्तर दिरंगाई कायदा २००६' या कायद्याचा बोर्ड सोबत लावावा

संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

  असंख्य कार्यालयात अधिकारी सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड लावून जनतेला भीती दाखवत आहेत. तो कायदा सरकारी कर्मचारी यांना वरदान ठरत आहे, त्या कायद्याचे बोर्ड, त्यामधील आरोप, दंड, शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आधार अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. अधिकार्‍यांनो तुम्ही तुमच्या कार्यालयात सरकारी कामात अडथळा याचा आधार घेता. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दफ्तर दिरंगाई कायदा २००६ काय सांगतो त्याचा बोर्ड लावावा म्हणजे समजेल की, दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सरकारी कामात अडथळा कायद्याला भारी पडत आहे. 

     कोणत्याही कार्यालयात असलेला सरकारी कामात अडथळा या बोर्डासोबत दफ्तर दिरंगाई कायदा २००६ चा असा बोर्ड लावावा. कोणत्याही सरकारी कामात अडथळा याच फक्त कायद्याचा बोर्ड असेल तर त्या अधिकार्‍याची गय करणार नाही. अधिकार्‍यांनो जनतेचे तुम्ही नोकर आहेत, नोकर म्हणूनच नोकरी करावी, जनतेला मानसिक त्रास होईल असे वागू नका, दिलेल्या अर्जाचे निवारण करा, अडचण असल्यास मार्गदर्शन करा, टाळाटाळ करू नये, जातिभेद करू नये, कर्तव्यात कसूर करू नये, विलंब करू नये, खोटा व चुकीचा अधिकारी यांना दिशाभूल करणारे ठराव करू नये, प्रामाणिकपणे नोकरी करीत असताना कर्तव्य जपा.  अधिकार्‍यांनो, कर्मचार्‍यांनो तुम्ही कामचुकारपणा करता, दिलेल्या अर्जाचे काय दखल घेतली असे अर्जदाराने विचारल्यास अर्जदाराने सरकारी कामात कुठे अडथळा केला? मी असंख्य अधिकारी प्रामाणिक आहेत हे पाहिले आहेत व बोटावर मोजणारे अधिकारी, कर्मचारी आळशी व कामचुकार आहेत त्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांनासुद्धा बदनामीला सामोरे जावे लागते ही गंभीर चिंताजनक बाब आहे. 

     सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून जनतेला मानसिक त्रास वेठीस धरत असाल तर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ नुसार तुम्हालाही या कायद्याने दंड, शिक्षा, शास्ती व निराधार करण्याचा या कायद्यात सुद्धा तरतूद आहे हे लक्षात घ्यावे. अधिकारी कर्मचारी यांनी आपली जनतेबाबत असलेली मानसिकता स्वच्छ ठेवावी. कामचुकारपणा करीत असल्यामुळे जनतेने जाब विचारू नये यासाठी जनतेला भीती दाखवण्यासाठी सरकारी कामात अडथळा बोर्ड लावून पळवाट करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात परंतु सध्याच्या काळात जनतेला होणारा मानसिक त्रास, छळ, पैसा वाया घालवून जनता आपला प्रश्न सुटतील म्हणून अधिकारी कर्मचारी यांच्याकडे येत असतात त्याचाही अधिकारी, कर्मचारी यांनी विचार करावा. अधिकारी आणि जनता हे समीकरण बंधुभावाचे समजून वागावे. अधिकारी कर्मचार्‍यांनो तुमच्या कामावर तुमची लायकी जनता ठरवते हे लक्षात घ्यावे. आपण स्वत:कडे बघावे. कामचुकारपणा आपण करीत आहोत का? प्रामाणिकपणे सेवा बजावत असाल तर सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड कार्यालयात कशासाठी? जरूर कायदा वापरा परंतु त्याचा दुरुपयोग करू नका, दहशत पसरवू नका, दमात घेवू नका, जनतेला भीती दाखवू नका. कर्तव्य जपा अशी मानसिकता चांगली ठेवा. जनतेच्या अडीअडचणी सोडवा, अडचणी असतील तर मार्गदर्शन करा असे कराल तर तुमच्या विषयी चांगला अधिकारी कर्मचारी म्हणून नाव निघेल. मूठभर, हरामखोर, भडवे, कामचुकार अधिकारी यांच्यामुळे चांगले कर्मचारी, अधिकारी यांना अपमानित व्हावे लागते. यामुळे कोणत्याही कार्यालयात सरकारी कामात अडथळा या कायद्याच्या बोर्डा बरोबर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ या कायद्याचा बोर्ड लावलाच पाहिजे. फक्त सरकारी कामात अडथळा हा बोर्ड असेल तर अधिकारी यांना दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार त्याचा हिशोब चुकता करणार असे ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे. 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...