Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

प्रत्येक कार्यालयात अधिकारी यांनी 'सरकारी कामात अडथळा' या कायद्यानुसार आरोप, दंड, शिक्षा याबाबत बोर्ड लावून जनतेला भीती दाखवण्याचे काम, त्या बोर्डाबरोबर अधिकारी यांनी आमची कर्तव्य यासाठी 'दफ्तर दिरंगाई कायदा २००६' या कायद्याचा बोर्ड सोबत लावावा

संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

  असंख्य कार्यालयात अधिकारी सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड लावून जनतेला भीती दाखवत आहेत. तो कायदा सरकारी कर्मचारी यांना वरदान ठरत आहे, त्या कायद्याचे बोर्ड, त्यामधील आरोप, दंड, शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आधार अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. अधिकार्‍यांनो तुम्ही तुमच्या कार्यालयात सरकारी कामात अडथळा याचा आधार घेता. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दफ्तर दिरंगाई कायदा २००६ काय सांगतो त्याचा बोर्ड लावावा म्हणजे समजेल की, दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सरकारी कामात अडथळा कायद्याला भारी पडत आहे. 

     कोणत्याही कार्यालयात असलेला सरकारी कामात अडथळा या बोर्डासोबत दफ्तर दिरंगाई कायदा २००६ चा असा बोर्ड लावावा. कोणत्याही सरकारी कामात अडथळा याच फक्त कायद्याचा बोर्ड असेल तर त्या अधिकार्‍याची गय करणार नाही. अधिकार्‍यांनो जनतेचे तुम्ही नोकर आहेत, नोकर म्हणूनच नोकरी करावी, जनतेला मानसिक त्रास होईल असे वागू नका, दिलेल्या अर्जाचे निवारण करा, अडचण असल्यास मार्गदर्शन करा, टाळाटाळ करू नये, जातिभेद करू नये, कर्तव्यात कसूर करू नये, विलंब करू नये, खोटा व चुकीचा अधिकारी यांना दिशाभूल करणारे ठराव करू नये, प्रामाणिकपणे नोकरी करीत असताना कर्तव्य जपा.  अधिकार्‍यांनो, कर्मचार्‍यांनो तुम्ही कामचुकारपणा करता, दिलेल्या अर्जाचे काय दखल घेतली असे अर्जदाराने विचारल्यास अर्जदाराने सरकारी कामात कुठे अडथळा केला? मी असंख्य अधिकारी प्रामाणिक आहेत हे पाहिले आहेत व बोटावर मोजणारे अधिकारी, कर्मचारी आळशी व कामचुकार आहेत त्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांनासुद्धा बदनामीला सामोरे जावे लागते ही गंभीर चिंताजनक बाब आहे. 

     सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून जनतेला मानसिक त्रास वेठीस धरत असाल तर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ नुसार तुम्हालाही या कायद्याने दंड, शिक्षा, शास्ती व निराधार करण्याचा या कायद्यात सुद्धा तरतूद आहे हे लक्षात घ्यावे. अधिकारी कर्मचारी यांनी आपली जनतेबाबत असलेली मानसिकता स्वच्छ ठेवावी. कामचुकारपणा करीत असल्यामुळे जनतेने जाब विचारू नये यासाठी जनतेला भीती दाखवण्यासाठी सरकारी कामात अडथळा बोर्ड लावून पळवाट करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात परंतु सध्याच्या काळात जनतेला होणारा मानसिक त्रास, छळ, पैसा वाया घालवून जनता आपला प्रश्न सुटतील म्हणून अधिकारी कर्मचारी यांच्याकडे येत असतात त्याचाही अधिकारी, कर्मचारी यांनी विचार करावा. अधिकारी आणि जनता हे समीकरण बंधुभावाचे समजून वागावे. अधिकारी कर्मचार्‍यांनो तुमच्या कामावर तुमची लायकी जनता ठरवते हे लक्षात घ्यावे. आपण स्वत:कडे बघावे. कामचुकारपणा आपण करीत आहोत का? प्रामाणिकपणे सेवा बजावत असाल तर सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड कार्यालयात कशासाठी? जरूर कायदा वापरा परंतु त्याचा दुरुपयोग करू नका, दहशत पसरवू नका, दमात घेवू नका, जनतेला भीती दाखवू नका. कर्तव्य जपा अशी मानसिकता चांगली ठेवा. जनतेच्या अडीअडचणी सोडवा, अडचणी असतील तर मार्गदर्शन करा असे कराल तर तुमच्या विषयी चांगला अधिकारी कर्मचारी म्हणून नाव निघेल. मूठभर, हरामखोर, भडवे, कामचुकार अधिकारी यांच्यामुळे चांगले कर्मचारी, अधिकारी यांना अपमानित व्हावे लागते. यामुळे कोणत्याही कार्यालयात सरकारी कामात अडथळा या कायद्याच्या बोर्डा बरोबर दफ्तर दिरंगाई कायदा २००६ या कायद्याचा बोर्ड लावलाच पाहिजे. फक्त सरकारी कामात अडथळा हा बोर्ड असेल तर अधिकारी यांना दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार त्याचा हिशोब चुकता करणार असे ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे. 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...