Skip to main content

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात जनतेने दिलेल्या अर्जाची अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी? मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

संपादक


सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिन आहे. या दिवशी जे अर्जदार आपले लेखी म्हणणे देत असतात त्याचे निवारण व्हावे, न्याय मिळवा या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात अर्जदार वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून अर्जदार सोलापूर येथे जात असतात. लोकशाही दिनादिवशी सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी हजर राहिले पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जावर त्वरित दखल घेवून त्याचे निवारण करून न्याय देणे हे लोकशाही दिनाचे पहिले कर्तव्य आहे. परंतु लोकशाही दिन हा फक्त कागदी घोडे नाचविण्यासाठी आहे असे दिसत आहे. अर्जदाराच्या अर्जाला अधिकारी यांच्याकडून दिशाभूल, टाळाटाळ, दफ्तर दिरंगाई केराची टोपली दाखविली जाते. पोहोच घ्या आणि घरी जावा हेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील लोकशाही दिनादिवशी दिसून येत आहे. ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. जनतेच्या अडीअडचणीचे निवारण होत नसेल, अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी? असे बहुजन राष्ट्रशकती सामाजिक संघटनेचे संस्थापक पत्रकार मा.अभिमन्यु बी.आठवले यांनी जाहीरपणे जनहितार्थ म्हणून आपली जनतेच्या हितासाठी आपली रोखठोक भूमिका मांडली. 
लोकशाही दिन जनतेसाठी “गाजरदिन” की “शापदिन”, की “वरदान दिन” हेच समजत नाही. लोकशाही दिन म्हणजे निवारण करून अधिकारी यांनी न्याय देणे किंवा अडचण असेल तर मार्गदर्शन करणे असे असायला हवे. लोकशाही दिनातील अर्जावरून नुसते कागदी घोडे नाचवून अधिकारी जनतेची अशीही बनवाबनवी करीत आहेत. लोकशाही दिनादिवशी वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहिले पाहिजे परंतु कोणतेही अधिकारी उपस्थित राहत नाहीत ही गंभीर बाब आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात लोकशाही दिन होताना दिसत नाही. यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तालुका पातळीवरील लोकशाही दिन व्हावा यासाठी आदेश काढावा. लोकशाही दिन जनतेसाठी न्याय दिन ठरला पाहिजे. 
लोकशाही दिनातील अर्जातील अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे, विलंब लावता कामा नये. जनतेच्या अडीअडचणीचे निवारण झाले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयातून लोकशाही दिन व जनतेने दिलेले अर्ज व त्याचे निवारण होत नसेल तर लोकशाही दिन हवा कशाला? तरी लोकशाही दिनात आलेल्या अर्जानुसार त्याची दखल घेवून निवारण करून न्याय द्यावा हीच अपेक्षा. जनतेचा अर्ज हा एक फिर्यादच असते त्यानुसार कायदेशीर मार्गाने व संविधानाला अनुसरूनच न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. 

 जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...