Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

अधिकार्‍यांनो "लायक" बना, "नालायक" बनू नका

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

अलीकडच्या काळात अधिकारी यांना "साहेब" म्हणताना लाज वाटते. अर्जदार आपले प्रश्न, अडीअडचणी सोडविल्या जाव्यात त्या त्या विभागाचे जे अधिकारी असतात त्या त्या अधिकार्‍याकडे अर्जदार अर्ज देतात, कर्मचारी पोच देतात पण त्या अर्जाचे निवारण करून त्याचवेळी न्याय देताना अधिकारी दिसत नाहीत हे मी संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे. अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. अर्जदाराचा पैसा, वेळ वाया घालवून अधिकारी यांच्याकडे अर्जदार अर्ज देतो, जेणेकरून अधिकारी न्याय देतील परंतु अर्जदाराच्या वाट्याला संकट, शिमगा येताना दिसते. अधिकारी यांनी तातडीने अर्जदाराने दिलेल्या अर्जाचे निवारण करून त्याबाबत निर्णय तसेच मार्गदर्शन केले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही. 

अधिकारी यांनी आलेल्या अर्जदाराच्या अर्जाचे निवारण करून "लायक" म्हणून नाव कमवावे "नालायक" म्हणून नको. "खुर्ची आणि पद" याला शोभेल असा न्याय निवाडा करावा. अर्जदाराने दिलेला अर्ज त्यामधील विषय याबाबत गुंतागुंतीचा विषय असेल तर अर्जदाराने काय करावे यासाठी अधिकारी यांनी मार्गदर्शन, सल्ला दिला पाहिजे, जेणेकरून अर्जदार समाधानी होईल अधिकारी यांना अर्जदार साहेब म्हणतो पण तोच साहेब "हरामखोर" निघतो हे मी पाहिले आहे. 

अर्जदाराने दिलेला अर्ज हा FIR असाच असू शकतो त्यामुळे त्याची अधिकारी यांनी दखल घेतलीच पाहिजे. दफ्तर दिरंगाई, टाळाटाळ, बनवाबनवी केली गेली नाही पाहिजे. अधिकारी यांनी लायक समजून त्या पदावर काम करता त्यावेळी जनतेच्या अर्जाचे निवारण केले गेले पाहिजे ही कर्तव्यता जपली पाहिजे. एक तर अधिकारी यांच्या ऑफिसचा सदैव दरवाजा बंद असतो, अधिकारी काळा की गोरा, चांगला की वाईट जनतेला समजत नाही ही भयानक अत्यंत वाईट बाब आहे. डोक्यावरती फॅन, बसायला फिरती खुर्ची, भरमसाठ पगार, येण्याजाण्यासाठी शासकीय वाहने, दारात दरवाजा उघडण्यासाठी कर्मचारी इ. सुखसोयी असतात त्यामुळे अधिकारी यांना "माज" चढतो परंतु माज उतरायला सुद्धा अर्जदार कमी पडणार नाहीत. "सरकारी कामात अडथळा" या कायद्याचा आधार अधिकारी घेतात हे मी पाहिले आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार निवारण केले का? म्हणून अधिकारी यांना जाब विचारला तर अर्जदाराचे चुकले काय? अर्जदाराने विचारू नये काय? असे अनेक प्रश्न अर्जदारापुढे उभे राहतात. 

ज्यावेळी अर्जदार यांना संताप येतो त्यावेळी अर्जदाराने अधिकारी यांच्या थोबाडीत मारली तर गुन्हा काय? कुठे केला? यासाठी अधिकारी यांनी अर्जदाराने दिलेल्या अर्जाची दखल घेवून निवारण करावे, न्याय देण्याचा प्रयत्न करावा, गुंतागुंतीचा वाद विवादाचा प्रश्न असेल तर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करावे एवढे जरी अधिकारी यांनी केले तर तो अधिकारी अर्जदाराच्या मनामध्ये लायक ठरेल नाहीतर नालायक म्हणून त्याची लायकी कळेल. अधिकारी यांनी पदाचा अभिमान बाळगून जनतेचे असलेले प्रश्न, अडिअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध रहावे. अधिकारी आणि जनता असे नाते जपावे. अधिकारी यांनी जनतेचा सेवक समजावे, मालक समजू नये याची दक्षता घ्यावी असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे. 

जनहितार्थ   

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 
९४२०३०२५६१
 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.










       

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...