Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात "संविधान भवन" बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत तरी बौद्ध समाजातील बांधवांनी यासाठी झटावे


उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

  गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी.

संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे. 

संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही. 

त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे.     

१) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे.

२) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील. 

३) तसेच संविधान भवन बांधण्यासाठी गाव पातळीवरील बौद्ध समाजाच्या लोकांची लोकसंख्या प्रमाणपत्र (२०११) च्या जनगणणेनुसार जोडणे आवश्यक आहे. 

४) त्याचप्रमाणे संविधान भवन बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडून निर्धारित केलेल्या बौद्ध समाजासाठी राखीव जागेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

५) तसेच यासाठी पदवीधर किंवा त्यापेक्षाही जास्त शिक्षण पात्र बौद्ध समाजातील व्यक्तीची व महिलांची संविधान भवन देखभाल व विनियोग समिति स्थापन करण्यात यावी. 

६) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने विनियोग समिति स्थापन करण्याकरिता ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक आहे त्यानुसार समिति स्थापन होईल.

७) तसेच देखभाल व विनियोग समितीचे अध्यक्ष हे बौद्ध जातीचे उच्च शिक्षित व्यक्ति महिला असेल. 

८) त्याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य संविधान भवनात सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये ग्रंथालय, डाटा एंट्री, साफसफाई, वीजपुरवठा इतर यानुसार लोकांची नेमणूक केली जाणार आहे. 

९) समितीपूर्ण बौद्ध समाजाची असले पाहिजे व उच्च शिक्षित व्यक्ति असावी.

१०) जागेचा नकाशा असा असला पाहिजे - त्याचप्रमाणे नमूना नं.८ चा उतारा ग्रामसेवक यांच्या सही व शिक्क्यांनी असला पाहिजे तो प्रस्तावास जोडणे. 

११) तसेच प्रस्तावावर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य संविधान भवन देखभाल समितीचे अध्यक्ष व इतर व्यक्तींची सही त्या प्रस्तावावर असायला हवी. 

१२) प्रस्ताव दाखल करत असताना बौद्ध समाजातील व्यक्तींनी एक प्रत आपल्याकडे राखून ठेवावी. तसेच चार प्रती काढून त्या ग्रामपंचायतमध्ये ठेवाव्यात व त्या प्रतिवर OC घ्यावी. तसेच २ प्रती गटविकास अधिकारी पंचायत समितिकडे देण्यात यावेत व त्यावर OC घेण्यात यावी ही कागदपत्रे सर्व पुरावा म्हणून राहतील. 

तरी सर्व बांधवांनी संविधान भवन बौद्ध समाजात होण्यासाठी त्वरित पाठपुरावा करावा. 

यासाठी समाजात जनजागृती व्हावी याहेतूने प्रसिद्धीद्वारे अभिमन्यु बी.आठवले यांनी केले आहे. 

संकलन जनहितार्थ   

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 
९४२०३०२५६१
 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

   

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...