Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात "संविधान भवन" बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत तरी बौद्ध समाजातील बांधवांनी यासाठी झटावे


उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

  गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी.

संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे. 

संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही. 

त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे.     

१) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे.

२) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील. 

३) तसेच संविधान भवन बांधण्यासाठी गाव पातळीवरील बौद्ध समाजाच्या लोकांची लोकसंख्या प्रमाणपत्र (२०११) च्या जनगणणेनुसार जोडणे आवश्यक आहे. 

४) त्याचप्रमाणे संविधान भवन बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडून निर्धारित केलेल्या बौद्ध समाजासाठी राखीव जागेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

५) तसेच यासाठी पदवीधर किंवा त्यापेक्षाही जास्त शिक्षण पात्र बौद्ध समाजातील व्यक्तीची व महिलांची संविधान भवन देखभाल व विनियोग समिति स्थापन करण्यात यावी. 

६) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने विनियोग समिति स्थापन करण्याकरिता ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक आहे त्यानुसार समिति स्थापन होईल.

७) तसेच देखभाल व विनियोग समितीचे अध्यक्ष हे बौद्ध जातीचे उच्च शिक्षित व्यक्ति महिला असेल. 

८) त्याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य संविधान भवनात सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये ग्रंथालय, डाटा एंट्री, साफसफाई, वीजपुरवठा इतर यानुसार लोकांची नेमणूक केली जाणार आहे. 

९) समितीपूर्ण बौद्ध समाजाची असले पाहिजे व उच्च शिक्षित व्यक्ति असावी.

१०) जागेचा नकाशा असा असला पाहिजे - त्याचप्रमाणे नमूना नं.८ चा उतारा ग्रामसेवक यांच्या सही व शिक्क्यांनी असला पाहिजे तो प्रस्तावास जोडणे. 

११) तसेच प्रस्तावावर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य संविधान भवन देखभाल समितीचे अध्यक्ष व इतर व्यक्तींची सही त्या प्रस्तावावर असायला हवी. 

१२) प्रस्ताव दाखल करत असताना बौद्ध समाजातील व्यक्तींनी एक प्रत आपल्याकडे राखून ठेवावी. तसेच चार प्रती काढून त्या ग्रामपंचायतमध्ये ठेवाव्यात व त्या प्रतिवर OC घ्यावी. तसेच २ प्रती गटविकास अधिकारी पंचायत समितिकडे देण्यात यावेत व त्यावर OC घेण्यात यावी ही कागदपत्रे सर्व पुरावा म्हणून राहतील. 

तरी सर्व बांधवांनी संविधान भवन बौद्ध समाजात होण्यासाठी त्वरित पाठपुरावा करावा. 

यासाठी समाजात जनजागृती व्हावी याहेतूने प्रसिद्धीद्वारे अभिमन्यु बी.आठवले यांनी केले आहे. 

संकलन जनहितार्थ   

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 
९४२०३०२५६१
 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

   

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...