Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

राजकारण म्हणजे “पैसा फेको तमाशा देखो” ही गंभीरबाब

संपादक

          कोणत्याही क्षेत्रातील निवडणुका असु दया त्यासाठी निवडून येण्यासाठी पैसा महत्वाचा ठरू शकत आहे. पैशापुढे मतदार लाचार झाला आहे. आपल्या पवित्र मताची किंमत पैशात मोजली जाते. राजकारणाचा खरा “किंगमेकर” पैसा आहे. पैशापुढे कोणताही उमेदवार डॉक्टर, वकील, इंजिनीअर, कोणत्याही शाखेचा पदवीधर, उच्च विचार सरणीचा मनमिळावू, अभ्यासूवृत्तीचा उमेदवार रिंगणात उभे असतील तर त्यांना मतदार किंमत देत नाही. परंतु ७ वी शिक्षण असलेले, जनतेशी संबंध कधीही नसलेले उमेदवार पैशाच्या जोरावरती निवडून येतात ही गंभीर बाब आहे. “लोकशाही” कागदपत्रापुरती राहिली आहे. सध्या लोकशाहीच “चांगभलं” झाल आहे. लोकशाहीला आर्थिकशाही घातक ठरत आहे. यापुढे सर्वसामान्य, उच्चशिक्षित उमेदवार जनतेला चालतील असे वाटत नाही. घमेंड खोर, गुंड, पैसेवाला, तस्कर असेच लोक मतदार निवडून देणार कारण त्यांचा पैसा घेतला जातो. पैशापुढे मतदार राजा बेशरम, दुबळा झाला आहे. मतदान यंत्राला दोष देण्यात अर्थ नाही. दोषी मतदान यंत्र नाही तर मतदार हे दोषी आहेत. राजकारण म्हणजे घराणेशाहीसाठी “वरदान” ठरले आहे. घराणेसाही रक्तपिपासो असले तरी मतदार घराणेशाहीच्या तालावर नाचत आहे. घराणेशाहीने मतदारांना “गुलाम” बनवले आहे असे सध्याचे चित्र आहे. राजकारण हे माणुसकीचे राहिले नसून पैसेवालेचे झाले आहे मला संपादक म्हणून वाटते. राजकारण हे समाजकारण यापुढी होईल असे वाटत नाही. सध्या राज्यकर्त्यांचे राजकारण हे पदवी बनले आहे. राजकारण म्हणजे “पैसा फेको तमाशा देखो” असे झाले आहे. पैसेवाल्यांनी मतदारांना कमकुवत बनविले आहे. पैशापुढे मतदार हे “माकड” झाले आहे. मतदारांनी पैसे घेतल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराकडे आमचे काम करा म्हणून पुढे जाण्याची त्यांची हिम्मत होत नसते त्यामुळे ५ वर्षे त्या उमेदवाराचे आनंदाचे जात असतात. त्यांना मतदारांची कामे करण्यासाठी किंवा वार्डाचा, प्रभागाचा विकास करण्यासाठी टेंशन नसते. फक्त शासकीय योजनाची नावे पुढे करून निवडून आलेले सर्वजण मिळून मिसळून शासकीय निधी “हडप” करण्याचा त्यांचा हेतु असतो. उमेदवारांना मतदाराचे काही देणेघेणे नसते कारण त्यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसा दिलेला असतो. निवडणुकीत घातलेला पैसा वसूल करण्यासाठी तो उमेदवार सतत झटत असतो. इतकेच 

बातमी

 अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...