Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

लालपरीचे चालक व वाहक जबाबदारी पत्करून “एक चाक कुटुंबावर व एक चाक रस्त्यावर” असे असताना प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या असेलेल्या मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य कराव्यात

संपादक

          एसटी लाल परी ही जनतेची नाडी असून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र धावत असते. त्यामध्ये चालक व वाहक यांची कर्तव्यनिष्ठा अत्यंत महत्वाची असते. दररोज एसटी महामंडळाला चालक व वाहक हजारो रुपये कमवून देत असतात. चालक व वाहक एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करीत नाहीत. पारदर्शी व स्वच्छ अशी नोकरी करतात. सर्व क्षेत्रातील नोकरदारांना भरमसाठ पगार शासन देते, आयोग लागू केला जातो. त्यांना विविध सवलती दिल्या जातात परंतु एसटी महामंडळाच्या लालपरीच्या कर्मचार्‍यांना मात्र तुटपुंज्या पगारात निवृत्त होईपर्यंत काम करावे लागत आहे. एसटीचा नोकरदार यांची परिस्थिति अत्यंत बिकट दयनीय अशी पाहावयास मिळत आहे. लालपरीचा चालक व वाहक स्वत:वर जबाबदारी घेवून दिवसरात्र “जनतेची सेवा व सरकारला मेवा” कमवून देत आहेत. असे असताना त्यांना मात्र कमी पगारात आयुष्य काढावे लागते. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍याची परिस्थिति सुधारली आहे असे दिसत नाही. लालपरीचा चालक व वाहक यांची नोकरी म्हणजे “एक चाक कुटुंबावर व एक चाक रस्त्यावर” असते. कामावर गेलेला आपला माणूस परत येईल की नाही हे सांगता येत नाही अशी परिस्थिति असते. सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी संप पुकारला आहे तो हक्कासाठी, न्यायासाठी आहे. संप करणे गैर नाही. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. जे चालक व वाहक दररोज शासनाला हजारो रुपये कमवून देतात. सर्व चालक वाहक या राज्याला दररोज कोट्यवधी रुपये मिळवून देतात त्यांना मात्र शासन वंचित ठेवत आहे. सर्व क्षेत्रापैकी काम करणारा एकमेव विभाग व महामंडळ म्हणजे लालपरीचा एसटी महामंडळ व प्रामाणिक त्याचे चालक व वाहक हेच खरे कर्मचारी आहेत. त्यांचा संप हा त्यांच्या हक्कासाठी आहे. त्यांच्या मागण्याही रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य करून संप मागे घेण्यास सांगावे. एसटी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनो मिळालेले जीवन उध्वस्त करू नका. आत्महत्या करणे म्हणजे तुमच्या कुटुंबावर फार मोठा आघात आहे तुम्ही घरातील कर्ता माणूस आहात. तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. आत्महत्याने प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्र सरकारने त्वरित या कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांना त्यांचा हक्क द्यावा. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यावरती कशी नसीबाने थट्टा आज मांडली” अशी म्हणण्याची वेळ येवू देवू नये. महाराष्ट्र शासनाने या  प्रामाणिक कर्मचार्‍याचे हित पहावे. सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यापेक्षा या जबाबदार कर्मचार्‍यांना भरपूर पगार दिला जावा असे वाटते.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

    

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...