संपादक रेशन दुकानातील गोर गरीब जनतेला मिळत असलेले धान्य त्यावरती सरकारने हमीपत्र घेण्याचे काम चालू केले आहे . रेशन कार्ड धारकांना शासनाकडून जे धान्य व इतर साहित्य मिळत होते . ते आता यापुढे बंद होईल असे चित्र दिसत आहे . शासनाने रेशन कार्ड धारकाकडून हमीपत्र घेण्याचे काम चालू केले त्या हमी पत्रात कार्ड धारक प्रामाणिकपणे माहिती देत आहेत . आज पर्यंत जसे रेशन दुकानाकडून जसा धान्यपुरवठा केला जात होता तसाच पुढेही चालू राहिला पाहिजे जेणेकरून निदान गोरगरीब त्या धान्यावरती जगू शकेल . जो गॅस धारक लाभार्थी आहे तो शासनाने ठरवलेल्या दरानुसार गॅस टाकी भरत असेल म्हणून तो श्रीमंत अथवा मध्यमवर्गीय होत नाही किंवा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे होत नाही . शासनाने रेशन कार्ड धारकाकडून नियम व अटीचे हमीपत्र भरून घेत आहे ते चुकीचे आहे . हा देशातील गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्यासारखा आहे . सध्याच्या काळात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आह...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे