Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

बिनविरोधी निवडणुका म्हणजे जनतेच्या पवित्र मतावर "आघात"

संपादक

सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागल्या असून असंख्य गाव पातळीवर बिनविरोधी सदस्य निवडले आहेत. तर काही ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या आहेत पण हे लोकशाहीसाठी “घातक” आहे, हा लोकशाहीचा “खून” आहे, लोकशाहीसाठी “शाप” आहे. जनतेला संविधानाने दिलेले मत न टाकता बिनविरोधी सदस्य निवडले ते योग्य नाही केवळ मतलबी पुढार्‍यांनी एकत्र येऊन आपआपल्या सोयीनुसार उमेदवार द्यायचा आणि बिनविरोधी पुढार्‍यांनी ना वार्डातील जनतेने, ना गावातील जनतेने हजर रहायचे, फक्त पुढार्‍यांनी संघमताने गावाची ना वार्डाची मीटिंग न घेता उमेदवार बिनविरोधी करतात ही पद्धत लोकशाहीसाठी घातक व चीड आणणारी, चिंता करणारी अशी आहे. बिनविरोधी सदस्य निवडताना त्या सदस्याची सामाजिक कामगिरी काय? तो वार्डात किंवा गावात सर्वधर्म समभाव वागतो का? मिसळतो का? तो अवैद्य धंदे करणारा आहे का? त्याची पात्रता काय? वार्डातील जनता तसेच गावातील जनतेला तो मान्य आहे का? तो वार्डातील व  जनतेची व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल का? स्वच्छ प्रतिमेचा आहे का? तो घमेंडीत वागतो का? इ. प्रश्नासाठी तो यशस्वी ठरेल का याचाही विचार पुढार्‍यांनी केला पाहिजे. केवळ भांडणतंटे, वादविवाद व पैसा खर्च होईल यामुळे बिनविरोधी सदस्य निवडणे योग्य नाही. पुढार्‍यांनी एकत्रित बसून गावातील किंवा वार्डातील जनतेला विश्वासात न घेता सदस्य निवडू नयेत व जनतेवर लादू नयेत. जनतेला संविधाने दिलेले पवित्र मत त्या मताला वार्‍यावरती सोडून बिनविरोधी निवड करणे अयोग्य आहे. बिनविरोधी निवडून आलेले सदस्य वार्डातील किंवा गावातील जनतेची कामे करतील का? का जनतेला म्हणतील मी कुठे मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. बिनविरोधी झालेल्या सदस्याकडे कामे घेवून जाता येत नाहीत. त्यांच्यावरती तसा अधिकारही पोहचत नाही. तो सदस्य आपआपसातील पुढार्‍यांचा असतो तो जनतेचा नसतो त्यामुळे बिनविरोधी निवडणूक म्हणजे पुढार्‍यांसाठी “वरदान” ठरू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या पवित्र मताला “केराची टोपली” दाखवली जाते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. बिनविरोधी निवड झालेल्या सदस्यावर जनतेला जनतेचा अधिकार पोहोचतो का हे सांगता येत नाही. निवडणूक लढवून जे सदस्य जाणार आहेत त्यांच्यावरती त्या वार्डातील जनतेचा हक्क असतो असे वाटते. बिनविरोधी निवडणूक म्हणजे जनतेच्या मतावर आघात असा आहे. बिनविरोधी निवडणूक म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे हे संपादक म्हणून माझे मत आहे. बिनविरोधी जे सदस्य झाले त्यांना जनतेला जास्त बोलता येणार नाही त्यामुळे बिनविरोधी निवडणुका म्हणजे “आपण सगळे भाऊ-भाऊ आलेला निधी वाटून खाऊ” अशी भूमिका राहू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे विकास होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण जनतेने निवडलेले ते सदस्य नाहीत. कारण आपआपसातील पुढार्‍यांनी एकत्र बसून निवडलेले ते जनतेचे सदस्य नसून ते पुढार्‍याचे सदस्य असणार आहेत. बिनविरोधी निवडणुकीला काही अर्थ नाही. अशा निवडणुका म्हणजे पुढार्‍यांचा मनमानी कारभार, विकास काय केला असे कोणी म्हणाले तर सदस्य, पुढारी म्हणणार की आम्ही कधी तुमच्याकडे मत मागितली. बिनविरोधी निवडणूका म्हणजे लोकशाहीसाठी विश्वासघात म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. निवडणुका कोणत्याही असुदया त्या जनतेच्या मतावरती झाल्या पाहिजेत. बिनविरोधी निवडणुका होणे म्हणजे पुढार्‍याची हुकुमशाही म्हणावी लागेल. बिनविरोधी सदस्य निवडताना पुढार्‍यांनी वार्डात गावात बैठका घेऊन उमेदवाराची नावे सुचवून जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वानुमते तो उमेदवार निवडावा. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या मतावर अन्याय आहे त्यामुळे निवडणुका जनतेच्या मतानुसारच झाल्या पाहिजेत असे वाटते त्यासाठी सरकारने बिनविरोधी निवडणूक घेण्यास प्रतिबंध करावा व जनतेला संविधानाने दिलेल्या मतानुसार आपला उमेदवार निवडून देण्याचा हक्क असावा असे वाटते. 

जनहितार्थ माझे मत 

अधिक जाहिरातीसाठी संपर्क   

संपादक मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार 

            

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...