Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

बिनविरोधी निवडणुका म्हणजे जनतेच्या पवित्र मतावर "आघात"

संपादक

सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागल्या असून असंख्य गाव पातळीवर बिनविरोधी सदस्य निवडले आहेत. तर काही ग्रामपंचायती बिनविरोधी झाल्या आहेत पण हे लोकशाहीसाठी “घातक” आहे, हा लोकशाहीचा “खून” आहे, लोकशाहीसाठी “शाप” आहे. जनतेला संविधानाने दिलेले मत न टाकता बिनविरोधी सदस्य निवडले ते योग्य नाही केवळ मतलबी पुढार्‍यांनी एकत्र येऊन आपआपल्या सोयीनुसार उमेदवार द्यायचा आणि बिनविरोधी पुढार्‍यांनी ना वार्डातील जनतेने, ना गावातील जनतेने हजर रहायचे, फक्त पुढार्‍यांनी संघमताने गावाची ना वार्डाची मीटिंग न घेता उमेदवार बिनविरोधी करतात ही पद्धत लोकशाहीसाठी घातक व चीड आणणारी, चिंता करणारी अशी आहे. बिनविरोधी सदस्य निवडताना त्या सदस्याची सामाजिक कामगिरी काय? तो वार्डात किंवा गावात सर्वधर्म समभाव वागतो का? मिसळतो का? तो अवैद्य धंदे करणारा आहे का? त्याची पात्रता काय? वार्डातील जनता तसेच गावातील जनतेला तो मान्य आहे का? तो वार्डातील व  जनतेची व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल का? स्वच्छ प्रतिमेचा आहे का? तो घमेंडीत वागतो का? इ. प्रश्नासाठी तो यशस्वी ठरेल का याचाही विचार पुढार्‍यांनी केला पाहिजे. केवळ भांडणतंटे, वादविवाद व पैसा खर्च होईल यामुळे बिनविरोधी सदस्य निवडणे योग्य नाही. पुढार्‍यांनी एकत्रित बसून गावातील किंवा वार्डातील जनतेला विश्वासात न घेता सदस्य निवडू नयेत व जनतेवर लादू नयेत. जनतेला संविधाने दिलेले पवित्र मत त्या मताला वार्‍यावरती सोडून बिनविरोधी निवड करणे अयोग्य आहे. बिनविरोधी निवडून आलेले सदस्य वार्डातील किंवा गावातील जनतेची कामे करतील का? का जनतेला म्हणतील मी कुठे मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. बिनविरोधी झालेल्या सदस्याकडे कामे घेवून जाता येत नाहीत. त्यांच्यावरती तसा अधिकारही पोहचत नाही. तो सदस्य आपआपसातील पुढार्‍यांचा असतो तो जनतेचा नसतो त्यामुळे बिनविरोधी निवडणूक म्हणजे पुढार्‍यांसाठी “वरदान” ठरू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या पवित्र मताला “केराची टोपली” दाखवली जाते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. बिनविरोधी निवड झालेल्या सदस्यावर जनतेला जनतेचा अधिकार पोहोचतो का हे सांगता येत नाही. निवडणूक लढवून जे सदस्य जाणार आहेत त्यांच्यावरती त्या वार्डातील जनतेचा हक्क असतो असे वाटते. बिनविरोधी निवडणूक म्हणजे जनतेच्या मतावर आघात असा आहे. बिनविरोधी निवडणूक म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे हे संपादक म्हणून माझे मत आहे. बिनविरोधी जे सदस्य झाले त्यांना जनतेला जास्त बोलता येणार नाही त्यामुळे बिनविरोधी निवडणुका म्हणजे “आपण सगळे भाऊ-भाऊ आलेला निधी वाटून खाऊ” अशी भूमिका राहू शकते. बिनविरोधी निवडणुकीमुळे विकास होईल की नाही हे सांगता येत नाही. कारण जनतेने निवडलेले ते सदस्य नाहीत. कारण आपआपसातील पुढार्‍यांनी एकत्र बसून निवडलेले ते जनतेचे सदस्य नसून ते पुढार्‍याचे सदस्य असणार आहेत. बिनविरोधी निवडणुकीला काही अर्थ नाही. अशा निवडणुका म्हणजे पुढार्‍यांचा मनमानी कारभार, विकास काय केला असे कोणी म्हणाले तर सदस्य, पुढारी म्हणणार की आम्ही कधी तुमच्याकडे मत मागितली. बिनविरोधी निवडणूका म्हणजे लोकशाहीसाठी विश्वासघात म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. निवडणुका कोणत्याही असुदया त्या जनतेच्या मतावरती झाल्या पाहिजेत. बिनविरोधी निवडणुका होणे म्हणजे पुढार्‍याची हुकुमशाही म्हणावी लागेल. बिनविरोधी सदस्य निवडताना पुढार्‍यांनी वार्डात गावात बैठका घेऊन उमेदवाराची नावे सुचवून जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वानुमते तो उमेदवार निवडावा. बिनविरोधी निवडणुकीमुळे जनतेच्या मतावर अन्याय आहे त्यामुळे निवडणुका जनतेच्या मतानुसारच झाल्या पाहिजेत असे वाटते त्यासाठी सरकारने बिनविरोधी निवडणूक घेण्यास प्रतिबंध करावा व जनतेला संविधानाने दिलेल्या मतानुसार आपला उमेदवार निवडून देण्याचा हक्क असावा असे वाटते. 

जनहितार्थ माझे मत 

अधिक जाहिरातीसाठी संपर्क   

संपादक मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार 

            

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...