Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

महाराष्ट्रातील मोजक्याच जातीतील व्यक्तींना पुढार्‍याकडून लोकसेवक बनण्याची संधी इतर जातींना कधी न्याय मिळणार?

संपादक

       आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, विधान परिषद इ. मध्ये केवळ मोजक्याच जातीतील व्यक्तींना लोकसेवक बनविण्याची पुढार्‍याची भूमिका असते. त्यामध्ये गाव पातळीवर मराठा, महार, मातंग, मुसलमान, घोंगडी धनगर, मेंडकी धनगर इ. समावेश असतो. तर वेळ पडल्यास इतर एखाद्या दुसर्‍या जातीचा विचार केला जातो तो म्हणजे ब्राह्मण, वाणी, जैन, बागवान या पलीकडे इतर जातीचा विचार गाव पातळीवर पुढारी करीत नाहीत हे मी संपादक म्हणून पाहत आहे. त्यामध्ये कोल्हाटी, वडर, लोहार, साळी, गडसी, परीट, कोळी इ. या समाजातील व्यक्तींना न्याय दिलेला दिसत नाही. तसेच अनुसूचीतील ५९ जाती, अनुसूचीत जमाती ४७ जाती, इतर मागासवर्ग, ओबीसी ३४६ जाती, विशेष मागास वर्ग एसबीसी ७ जाती, विभक्त जाती (अ) व्हीजे (ए) १४ जाती, भटक्या जाती (ब) ३७ जाती, भटक्या जाती (क) एनटी (सी), भटक्या जाती (ड) एनटी (डी), तसेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसईबीसी अशा प्रवर्गातील मोजक्या जातींना पुढार्‍यांची पसंती असते. इतर जातीने फक्त मतदान करायचे का? ते कधी लोकसेवक बनणार? सध्या तर घरातच पद असावे हे पुढार्‍यांचे चाललेले असते. शेकडो जाती लोकसेवक बनण्यापासून वंचित आहेत. त्या जाती फक्त मतदान करण्यास आहेत की काय? याचा विचार गल्ली पासून दिल्ली पर्यंत होणार की नाही? याची खंत वाटते. मी संपादक म्हणून गाव पातळीपासून दिल्ली पर्यंत मोजक्याच जातीतील व्यक्तींना पुढारी हात मिळवणी करून आरक्षणानुसार लाभ देतात. आरक्षण नसते तर कोणत्याच जातीला न्याय मिळाला नसता. पुढार्‍यांची मनमानी, हुकुमशाही, दडपण याखाली हजारो जातीच्या लोकांना गुलाम बनावे लागले असते. परंतु माझे मत आहे की गावातील एकूण जाती व त्यानुसार त्या जातीतील व्यक्तींना न्याय दिला जावा. त्यांनाही सत्तेत पुढार्‍यांनी सत्तेत वाटा द्यावा. सतत मोजक्याच जातीचे लोकसेवक सतत बनविणे हे लोकशाहीला घातक आहे. गरीब अथवा श्रीमंत असा भेदभाव करू नये. मोजक्या जातीतील व्यक्ति घेवूनच पुढारी राजकारण करीत आहेत हे निंदनीय आहे त्यामुळे गाव पातळीपासून देशपातळी पर्यंत जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातींना प्रत्येक क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून घेतले तर सर्वांना न्याय मिळेल असे वाटते.      

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार 

टीप : जे दिसले, जे अनुभवले, जे पाहिले, तेच लिहले

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...