Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात जनतेने दिलेल्या अर्जाची अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी? मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

संपादक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिन आहे. या दिवशी जे अर्जदार आपले लेखी म्हणणे देत असतात त्याचे निवारण व्हावे , न्याय मिळवा या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात अर्जदार वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून अर्जदार सोलापूर येथे जात असतात. लोकशाही दिनादिवशी सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी हजर राहिले पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जावर त्वरित दखल घेवून त्याचे निवारण करून न्याय देणे हे लोकशाही दिनाचे पहिले कर्तव्य आहे. परंतु लोकशाही दिन हा फक्त कागदी घोडे नाचविण्यासाठी आहे असे दिसत आहे. अर्जदाराच्या अर्जाला अधिकारी यांच्याकडून दिशाभूल , टाळाटाळ , दफ्तर दिरंगाई केराची टोपली दाखविली जाते. पोहोच घ्या आणि घरी जावा हेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील लोकशाही दिनादिवशी दिसून येत आहे. “ ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. जनतेच्या अडीअडचणीचे निवारण होत नसेल , अधिकारी दखल घेत नसतील तर लोकशाही दिन का आणि कशासाठी ? असे बहुजन राष्ट्रशकती सामाजिक संघटनेचे संस्थापक पत्रकार मा.अभिमन्यु बी.आठ...